AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी एकटा आलो अन्..; मृत्यूपूर्वी औरंगजेबाचे अखेरचे शब्द काय होते?

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट थिएटर आणि सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना इतिहासाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर हा चित्रपट आधारित आहे.

मी एकटा आलो अन्..; मृत्यूपूर्वी औरंगजेबाचे अखेरचे शब्द काय होते?
AurangzebImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 02, 2025 | 3:30 PM
Share

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये आणि सोशल मीडियावर बरीच चर्चा घडवून आणली आहे. या चित्रपटामुळे आजच्या पिढीलाही इतिहासाबद्दल अधिक जाणून घेण्यात रस निर्माण झाला आहे. ‘छावा’ या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये पहायला मिळतं की आपल्याच जवळच्या लोकांनी केलेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज मुघलांकडून पकडले जातात आणि त्यानंतर औरंगजेब त्यांना धर्मांतर करण्यास सांगतो. मात्र छत्रपती संभाजी महाराज धर्मांतर करण्यास नकार दिल्यानंतर औरंगजेब त्यांचा अतोनात छळ करतो. यानंतर पुढे औरंगजेबाचं काय होतं, हे चित्रपटात दाखवलं नाही. या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्नाने क्रूर औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. त्याच्या दमदार अभिनयकौशल्याचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक होत आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतर मराठे एकत्र आले. मुघलांविरुद्धच्या त्यांच्या प्रतिकाराला आणखी बळकटी मिळाली. औरंगजेब हा सहावा मुघल सम्राट होता. त्याने 1658 पासून 1707 पर्यंत राज्य केलं. औरंगजेब इतका क्रूर होता की त्याने त्याच्या वडिलांना कैद करून आणि मोठ्या भावाला ठार मारून गादी मिळवली होती. इतिहासकारांनी त्याचं वर्णन अत्याचारी म्हणून केलंय.

अखेर 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला. त्याला खुलदाबाद इथल्या एका खुल्या जागेतील कबरीत दफन करण्यात आलं. इंडोलॉजिस्ट स्टॅन्ली वोल्पर्ट म्हणाले की, “मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचलेल्या औरंगजेबाचे त्याच्या मुलासमोर अखेरचे शब्द असे होते की, मी एकटा आलोय आणि अनोळखी म्हणून जातोय. मला माहीत नाही की मी कोण आहे आणि मी काय करतोय.” काही अहवालांमध्ये असंही नमूद केलंय की औरंगजेबाचे शेवटचे शब्द “माझ्यानंतर, अराजकता” असे होते.

‘छावा’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा इतिहासाची पानं उलगडली गेली आहेत. 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने देशभरात आतापर्यंत 433.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर ‘छावा’ची आतापर्यतची जगभरातील कमाई ही 590 कोटींवर पोहोचली आहे.

Follow Us
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.