AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लतादीदींच्या गाण्यांची नक्कल करत गाणं शिकल्या, सुषमादेवींच्या आवाजाला तोड नाही; वाचा सविस्तर

आंबेडकरी चळवळीतील सुरुवातीच्या दोन पिढ्या प्रचंड ध्येयवादी होत्या. (I learned to sing only after listening to Lata Didi's songs, says sushma devi)

लतादीदींच्या गाण्यांची नक्कल करत गाणं शिकल्या, सुषमादेवींच्या आवाजाला तोड नाही; वाचा सविस्तर
sushma devi
| Updated on: May 14, 2021 | 5:05 PM
Share

मुंबई: आंबेडकरी चळवळीतील सुरुवातीच्या दोन पिढ्या प्रचंड ध्येयवादी होत्या. घरावर तुळशीपत्रं ठेवून आंबेडकरी विचार घराघरात पोहोचवण्याचं काम या पिढीने केलं. या पिढीतील कलावंतांनीही आपल्या गाण्याच्या माध्यमातून प्रबोधनाच्या चळवळीला पेटतं ठेवलं. सुषामादेवीही त्यापैकीच एक होत्या. त्यांनीही प्रबोधनाच्या चळवळीचा झेंडा खांद्यावर घेऊन गायनाच्या माध्यमातून गावागावात जाऊन लोकांचं प्रबोधन केलं. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. (I learned to sing only after listening to Lata Didi’s songs, says sushma devi)

पाचव्या वर्षापासून गायनास सुरुवात

वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासूनच त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. खेळण्या बागडण्याच्या वयातही त्या प्रबोधनाच्या चळवळीकडे त्या वळल्या. सुषमादेवी आणि त्यांची बहीण लक्ष्मीदेवी दोघींनीही लहान वयापासूनच गाणी गायला सुरुवात केली. सुषमादेवींची आई वांचळाबाई आणि वडील जगन्नाथ जावळे दोघेही गायक होते. वडील तबलाही वाजवायचे. तर बहीण हार्मोनियम वाजवायची. हे सर्वजण मिळून सिनेमाच्या चालीवरील गाणी गायची. त्यातून चार पैसे मिळायचे आणि घर खर्च चालायचा. वयाच्या 10 व्या वर्षी सुषमादेवींनी बाबासाहेबांवरील पहिलं गाणं गायलं.

आई मी जातो भीमाच्या घरी, येणार नाही पुन्हा माघारी…

सुषमादेवींनी गायलेलं हे पहिलं गाणं. जीने की राह या सिनेमातील एका गाण्याच्या चालीवरील हे गाणं होतं. हे गाणं त्या तन्मयतेने गायच्या.

पहिलाच कार्यक्रम हाऊसफुल्ल

त्रिसरणाची, पंचशीलेची, मंगलमय धम्माची, करीन आरती धरतीवरती मंगलमय नामाची, लेक मी भीमाची, नात आहे गौतमाची…

वामनदादा कर्डक यांचं स्वतंत्र चालीवरील त्यांचं हे गाणं त्याकाळी खूप गाजलं. बाबासाहेबांचं स्वतंत्र चालीवर गायलेलं त्यांचं हे पहिलंच गाणं होतं. या गाण्यामुळे त्यांना गायिका म्हणून ओळख मिळवून दिली. नागपुरात त्यांचा किसन खरात यांच्यासोबत यांच्याबरोबर गाण्याचा पहिला सामना झाला. हा सामना तिकीट लावून झाला होता. हे विशेष. नवख्या गायिकेला तिकीट लावलेला कार्यक्रम मिळणं आणि त्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होणं ही त्याकाळातील मोठी गोष्ट होती. ही गर्दी होण्यामागे कारणही तसंच होतं. गायिका म्हणून सुषमादेवी तेव्हा नागपुरातील घराघरात पोहोचलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती.

लतादीदींची गाणी ऐकून…

सुषमा देवींनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले नाहीत. त्यांना आवाजाची देणगी उपजतच लाभली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची गाणी त्या प्रचंड ऐकायच्या. लतादीदी गातात तसं हुबेहुब गाण्याचा त्या प्रयत्न करायच्या. हीच त्यांची संगीत साधना होती. त्यातूनच त्यांना हरकती, ताना, मुरक्या, आरोह-अवरोहची जाण आली. त्यांची बहीण लक्ष्मीदेवींना त्यांना घरीच गाणं शिकवलं. त्यामुळे त्यांचा आवाज तयार झाला. आजही त्या खणखणीत गातात, त्यांच्या आवाजाला आजही तोड नाही. त्यांचे पती विश्वकांत महेशकर स्वत: संगीतकार, गीतकार आणि हार्मोनियम मास्टर होते. बहीण लक्ष्मीदेवी आणि पती विश्वकांत महेशकर हे दोघेही त्यांचे खऱ्या अर्थाने गुरु आहेत. (साभार, आंबेडकरी कलावंत) (I learned to sing only after listening to Lata Didi’s songs, says sushma devi)

संबंधित बातम्या:

पत्ता बदलला, गाणं सोडून दिलं, आवाज बसला, अनेक अफवा उठूनही ‘ही’ गायिका डगमगली नाही; वाचा सविस्तर

वडील कडिया काम करायचे, गाणं शिकल्या नाहीत, पण आवाज दमदार; वाचा, वैशाली शिंदे कशा घडल्या?

गाजलेल्या ‘नाजुका’ मालिकेत काम करण्याची ऑफर नाकारली, आज पश्चात्ताप; गायिका नंदा नांद्रेकर काय म्हणतात?

(I learned to sing only after listening to Lata Didi’s songs, says sushma devi)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.