AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: तिसऱ्या सामन्यासह मालिका कोण जिंकणार? दुपारी 1 वाजताच स्पष्ट होणार!

India vs South Africa 3rd Odi : टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिषक रायन टेन डेस्काटे यांनी तिसऱ्या सामन्याआधी 2 मुद्द्यांवरुन भीती व्यक्त केली. डेस्काटे यांनी पत्रकार परिषदेत कोणत्या मुद्द्यांवरुन भाष्य केलं? जाणून घ्या

IND vs SA: तिसऱ्या सामन्यासह मालिका कोण जिंकणार? दुपारी 1 वाजताच स्पष्ट होणार!
Rohit Sharma and Virat Kohli Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Dec 05, 2025 | 9:34 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याची चाहत्यांना उत्सूकता लागून आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे मालिका विजेता संघ कोण असणार? हे तिसऱ्या सामन्याच्या निकालासह स्पष्ट होईल. तिसरा आणि अंतिम सामना शनिवारी 6 डिसेंबरला होणार आहे. भारताने या मालिकेत विजयी सुरुवात केली . त्यामुळे भारताला दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने 359 धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि भारतावर मात केली. आता तिसऱ्या सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

या सामन्यातील एक चूकही निर्णायक ठरु शकते. त्यामुळे दोन्ही संघ विशाखापट्टणममध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. मात्र या सामन्याआधी टीम इंडियाला एका मुद्द्याबाबत भीती जाणवत आहे.

सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद पार पडली. टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेस्काटे यांनी पत्रकार परिषेदला संबोधित केलं. डेस्काटे यांच्या बोलण्यावरुन कुठेतरी टीम इंडियात भीतीचं वातावरण असल्याचं जाणवलं. डेस्काटे यांच्यानुसार, विशाखापट्टणममध्ये दव (Due Factor) निर्णायक ठरणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला तर मालिका गमवावी लागू शकते, याची भीतीही टीम इंडियाला सतावत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारताच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला आहे. तसेच तिसऱ्या सामन्यात दुपारी 1 वाजता टॉस होणार आहे. त्यामुळे मालिका विजेता कोण असणार? हे 1 वाजता निश्चित होईल, असं म्हटलं जात आहे.

टेन डेस्काने काय म्हणाले?

पहिल्या 2 सामन्यांत ड्यू फॅक्टर महत्त्वाचा ठरला. तसेच शनिवारी होणाऱ्या सामन्यातही तसंच होऊ शकतं, अशी भीती रायन टेन डेस्काटे यांनी बोलून दाखवली.

“दव एक मोठा मुद्दा आहे. आता यावर मार्ग शोधायचा ही आमची जबाबदारी आहे. विशाखापट्टणम येथील खेळपट्टी हायस्कोअरिंग आहे. इथे बाउंड्री लहान आहे. मात्र इथे पहिले बॅटिंग येणार की बॉलिंग? हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे”, असं डेस्काटे यांनी नमूद केलं. टीम इंडियाच्या विरोधात सलग गेल्या 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये नाणेफेकीचा कौल लागला आहे. त्यामुळे टीम इंडियाची धाकधुक आणखी वाढली आहे. अशात आता टीम इंडिया मैदान मारत मालिका जिंकणार की दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा धमाका करणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

Follow Us
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला.
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख....
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख.....
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी पॅरामिलिटरी फोर्स म्हणत राऊतांचे.....
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी पॅरामिलिटरी फोर्स म्हणत राऊतांचे......