AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मला अशी पत्नी नको जी..”; अमिताभ बच्चन यांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट, जया यांच्याकडून खुलासा

अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्याशी एका अटीवर लग्न केलं होतं. याचा खुलासा खुद्द जया यांनी नात नव्या नवेलीच्या पॉडकास्टमध्ये केला. बिग बी आणि जया यांच्या लग्नाला 50 वर्षांहून अधिक काळ उलटला आहे.

मला अशी पत्नी नको जी..; अमिताभ बच्चन यांनी लग्नापूर्वी ठेवली होती 'ही' अट, जया यांच्याकडून खुलासा
Amitabh Bachchan and Jaya BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 26, 2025 | 1:13 PM
Share

अभिनेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला आता 50 वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. या दोघांनी 3 जून 1973 रोजी लग्नगाठ बांधली. जया बच्चन यांच्या घरीच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. अमिताभ आणि जया यांची प्रेमकहाणी तर जगजाहीर आहे. परंतु लग्नाआधी बिग बींनी जया यांच्यासमोर एक अट ठेवल्याचं फार क्वचित लोकांना माहीत असेल. याबद्दलचा खुलासा खुद्द जया यांनी नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्ट मुलाखतीत केला होता.

लग्नानंतर आपल्या पत्नीने पूर्ण वेळ काम करू नये, याबाबत अमिताभ बच्चन ठाम होते. ‘व्हॉट द हेल नव्या’ या नातीच्या पॉडकास्टमध्ये जया म्हणाल्या, “आम्ही ऑक्टोबरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण तोपर्यंत माझ्या हातातील काम कमी होणार होतं. पण त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की मला 9 ते 5 वेळेत काम करणारी पत्नी नकोय. तू काम कर, पण दररोज करू नकोस. तू तुझे प्रोजेक्ट्स आणि काम योग्य लोकांसोबत निवड, असं ते म्हणाले होते.”

जया आणि अमिताभ बच्चन यांची पहिली भेट 1971 मध्ये ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ या चित्रपटादरम्यान झाली. त्यानंतर या दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’, ‘शोले’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘सिलसिला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ही लोकप्रिय जोडी एकत्र झळकली. पहिल्या भेटीच्या दोन वर्षांनंतर 3 जून 1973 रोजी जया आणि बिग बींनी लग्न केलं.

जया बच्चन यांच्याशी लग्नानंतर अमिताभ बच्चन बॉलिवूड इंडस्ट्रीत सुपरस्टार झाले. तर दुसरीकडे जया यांनी निवडक चित्रपट करण्यावर भर दिला. त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ कुटुंबाला देण्यास प्राधान्य दिलं. श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या जन्मानंतर जया यांनी कामातून मोठा ब्रेक घेतला. त्यांची मुलगी श्वेता बच्चनने निखिल नंदाशी लग्न केलं. निखिल नंदा हा करीना, करिश्मा आणि रणबीर कपूर यांचा चुलत भाऊ आहे. तर मुलगा अभिषेकने ऐश्वर्या रायशी लग्न केलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.