AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान-ऐश्वर्याचा हा चित्रपट पाहिला अन् जया बच्चन काही न बोलता थेट निघून गेल्या… दिग्दर्शकही विचारात पडले

सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा गाजलेला चित्रपट जो प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला तो चित्रपट पाहून जया बच्चन यांनी अशी काही प्रतिक्रिया दिली होती की चित्रपटाचे दिग्दर्शक देखील विचारात पडले. त्यांना हेही समजत नव्हतं की नक्की जया यांना हा चित्रपट आवडला आहे की नाही. 

सलमान-ऐश्वर्याचा हा चित्रपट पाहिला अन् जया बच्चन काही न बोलता थेट निघून गेल्या... दिग्दर्शकही विचारात पडले
Jaya Bachchan's Silent Exit After Hum Dil De Chuke Sanam: Sanjay Leela Bhansali's SurpriseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 16, 2025 | 1:48 PM
Share

जया बच्चन नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. जया बच्चन त्यांच्या फटकळ स्वभावामुळे जास्त चर्चेत असतात. हे फक्त त्यांच्या चाहत्यांच्याबाबतच होत नाही तर बऱ्याच सेलिब्रिटींनाही त्यांचा हा अनुभव आला आहे. त्यातील एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी. संजय लीला भन्साळी हे त्यांच्या भव्य सेट्स, उत्तम संगीत आणि उत्तम प्रेमकथा असलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जातात.

सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा गाजलेला हा चित्रपट

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे अनेक चित्रपट आजही लोकांच्या मनात आहेत. त्यांच्या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटातील गाणी.असाच एक चित्रपट म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’. हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. आजही हा चित्रपट लोक आवडीने पाहतात आणि त्यातील गाणी देखील आजही लोकांच्या ओठांवर दिसतात. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर जया बच्चनची प्रतिक्रिया पाहून दिग्दर्शक स्वतःही थक्क झाले होते.

जया बच्चन यांना सलमान आणि ऐश्वर्याचा हा चित्रपट आवडला नाही

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या प्रिव्ह्यू स्क्रीनिंग दरम्यान जया बच्चन यांनी गंभीर प्रतिक्रियेवरून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना असे वाटले की त्यांना सलमान आणि त्यांची सून ऐश्वर्या राय यांचा चित्रपट अजिबात आवडला नाही. एका मुलाखतीत संजय लीला भन्साळी यांनी स्वत: याबद्दल सांगितलं होतं. दिग्दर्शकाने यासाठी तीन लोकांना श्रेय दिले. बरं त्यांच्या या चित्रपटाला जे बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशंसा मिळाली त्याबद्दलच एक श्रेय त्यांनी अभिनेत्री जया बच्चनला दिलं. तथापि, भन्साळी यांनी जयाला चित्रपट आवडत नाही असे वाटल्याने त्यांच्या एका गैरसमजाची आठवणही करून दिली.

भन्साळींना जय बच्चन यांनी फोन केला अन्….

‘हम दिल दे चुके सनम’ च्या स्पेशल स्क्रिनिंगनंतर अनेक प्रेक्षक येऊन त्यांचे कौतुक करत होते, तसेच अनेक सेलिब्रिटींनी देखील संजय यांचे कौतुक केले पण जया बच्चन यांनी तसे केले नाही, जया भन्साळींकडे पाहून हसल्या आणि नंतर काहीही न बोलता शांतपणे निघून गेल्या. त्यानंतर जया बच्चन यांच्या शांततेने त्यांना असा विचार करायला भाग पाडले की कदाचित त्यांना हा चित्रपट आवडला नसेल.

तथापि, एके दिवशी जयाने संजय लीला भन्साळींना फोन केला आणि त्यांचा हा गैरसमज दूर केला. जया बच्चन यांना चित्रपटाचा तिरस्कार करण्याऐवजी ‘हम दिल दे चुके सनम’ इतका आवडला की त्यांनी बर्लिन चित्रपट महोत्सवासाठी त्याची शिफारस केली आणि तो आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचवण्याची खात्री केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.