AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नामदेव ढसाळ कोण? विचारणाऱ्याला चपराक रंगवायला हवी होती- जितेंद्र आव्हाड

सेन्सॉर बोर्डातील काही अधिकाऱ्यांनी एका चित्रपटातील नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आक्षेप घेत 'नामदेव ढसाळ कोण' असा प्रश्न केला होता. त्यावर राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

नामदेव ढसाळ कोण? विचारणाऱ्याला चपराक रंगवायला हवी होती- जितेंद्र आव्हाड
Jitendra AwhadImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 28, 2025 | 4:46 PM
Share

‘चल हल्ला बोल’ या चित्रपटासाठी बंडखोर कवी आणि दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांनी कविता लहिल्या होत्या. त्यांच्या कवितांचा वापर सिनेमामध्ये करण्यात आला. जेव्हा हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे गेला तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी या नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आक्षेप घेत ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असा सवाल केला होता. त्यांच्या या प्रश्नावर सध्या सर्वच स्तरांमधून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाच्या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत, ‘नामदेव ढसाळ कोण होता? असा सवाल विचारणाराच्या त्या निर्मात्याने कानशिलात चपराक रंगवायला हवी होती आणि सांगायला हवं होतं की हा आहे नामदेव ढसाळ.’

नुकताच जितेंद्र आव्हाड यांनी सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयामध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि सांगितले की, ‘नामदेव ढसाळ कोण आहेत ते, यासोबतच सोमवारी पाच वाजता सिंचन बोर्डाचे जे सीईओ आहेत त्यांची आणि माझी भेट होणारे. त्या भेटीमध्ये या सगळ्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावणार आहे. सरकारला जर एवढीच पडली असेल तर त्यांनी या मुर्ख अधिकाऱ्याला दिल्लीला पाठवा. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. आपण सगळे षंड बनलो आहोत आणि याला जर वाचा फोडली नाही तर आपल्याला षंड बनून आयुष्य जगावं लागेल.’

काय आहे प्रकरण?

‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट १ जुलै २०२४ रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डकडे सबमिट करण्यात आला होता. पण चित्रपटातील कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मांडले. त्यानंतर या कविता नामदेव ढसाळ यांनी लिहिल्याची माहिती देण्यात आली होती. त्यावर अधिकाऱ्यांनी, ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असे उत्तर दिल्याचे समोर आले.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.