AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | इंस्टाग्रामवर भडकली ‘बॉलिवूड क्वीन’, म्हणाली पुढच्या निवडणुकीत भाजपसाठी ठरू शकतो धोकादायक!   

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या काही दिवसांपासून तिच्या ट्विट्समुळे चर्चेत आली आहे. तिने नेहमी अशीच काही वक्तव्य करत असते, ज्यामुळे नवीन कॉन्ट्रोवर्सी निर्माण होत असतात.

Kangana Ranaut | इंस्टाग्रामवर भडकली ‘बॉलिवूड क्वीन’, म्हणाली पुढच्या निवडणुकीत भाजपसाठी ठरू शकतो धोकादायक!   
कंगना रनौत
| Updated on: Apr 27, 2021 | 11:24 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या काही दिवसांपासून तिच्या ट्विट्समुळे चर्चेत आली आहे. तिने नेहमी अशीच काही वक्तव्य करत असते, ज्यामुळे नवीन कॉन्ट्रोवर्सी निर्माण होत असतात. आतापर्यंत कंगना ट्विटरवर राग काढायची, पण आता तिने इंस्टाग्रामवरही आपला राग व्यक्त केला आहे. 2024च्या निवडणुकीत ते भाजपालाही धोका बनू शकते, असेही कंगना म्हणाली (Kangana Ranaut angry on Social Media Platform Instagram).

कंगनाने लिहिले की, ‘इन्स्टाग्रामवर सगळेच मूर्ख लोक भरलेले आहेत. येथे ज्यांचा आयक्यू कमी आहे, त्यांचे कौतुक केले जाते. मात्र, यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की येथे छोट्या व्यवसायाला चालना मिळते. परंतु, विरोधक आता याचा चुकीचा वापर करत आहेत. ते भाजपविरूद्ध द्वेष पसरवत आहेत.’

दुसर्‍या ट्विटमध्ये कंगनाने लिहिले की, ‘ही मध्यमवर्गाची टिक-टॉक चर्चा आहे. या मूर्खांचे भांडवलदार, साम्यवादी आणि जिहादींनी अपहरण केले आहे. यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाला धोका निर्माण होऊ शकतो. जर या विदूषक फॅशनसाठी शर्टखाली सायकलिंग शॉर्ट्स घालू शकतात, तर मग यांना कशानेही भ्रमित करता येऊ शकते.’

कंगनाने नंतर आणखी एक ट्विट केले आहे, ज्यात तिने पीएम मोदींचे कौतुक केले आहे. कंगनाने लिहिले की, ‘ते परिपूर्ण नेता आहेत, कुणाची बाहुली नाही. मातीचा लेक ज्याने स्वत: साठीच नव्हे, तर भारतासाठी स्वप्न पाहण्याची हिंमत केली. काहीही करा, त्यांचे काहीही नुकसान होणार नाही. ते आणखी उंचीवर जातील आणि तुम्ही जळतच राहाल.'(Kangana Ranaut angry on Social Media Platform Instagram)

पाहा कंगनाचे ट्विट

तापसीला ‘शीमॅन’ म्हटल्याने झाली ट्रोल

कंगनाने अलीकडेच तापसीबद्दल एक ट्विट केले होते, ज्यात तिने ‘शीमॅन खूप हॅपी होईल’, असे म्हटले होते. मात्र, नेटकऱ्यांना हा शब्द आवडला नाही. असे शब्द वापरल्याबद्दल त्यांनी कंगनाला खूप ट्रोल केले. तथापि, कंगनाने पुन्हा एकदा आपले स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की, लोक इतके नकारात्मक कसे विचार करू शकता. मला वाटले की हा शब्द तिच्या रफ अँड टफ लूकला पूरक आहे. पण लोक इतका नकारात्मक विचार कसा करू शकतात हे मला समजत नाही.

जयललितांच्या बायोपिकमध्ये दिसणार कंगना

कंगना लवकरच ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिवंगत नेत्या ‘जयललिता’ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. परंतु, त्यानंतर कंगनाने सांगितले होते की, तिचा चित्रपट प्रथम थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. थिएटरच्या आधी हा चित्रपट कोणत्याही व्यासपीठावर प्रदर्शित होणार नाही.

(Kangana Ranaut angry on Social Media Platform Instagram)

हेही वाचा :

मलायकाच्या प्रेमात आकंठ बुडलाय अर्जुन कपूर, कौतुक करत म्हणाला ‘तिने मला खूप काही शिकवले’…

‘सैराट’मधली ‘आनी’ आता काय करते? जाणून घ्या ‘आर्ची’ची मैत्रीण साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीबद्दल…

Follow Us
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित.