AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajay Devgn साठी ‘या’ दोन प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये वाद; अभिनेत्यानं उरकलं काजोलसोबत लग्न

अजय देवगण याच्यासाठी दोन प्रसिद्धीमधील वाद पोहोचला टोकाला; दोघी एकमेकींचं तोंड देखील पाहत नव्हत्या, अशात अभिनेत्याने काजोल हिच्यासोबत केलं लग्न

Ajay Devgn साठी 'या' दोन प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये वाद; अभिनेत्यानं उरकलं काजोलसोबत लग्न
| Updated on: Mar 18, 2023 | 5:19 PM
Share

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता अजय देवगण बॉलिवूडवर राज्य करत आहे. अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेला अजय ९० च्या दशकापासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. आज अभिनेता पत्नी आणि अभिनेत्री काजोल हिच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अनेक अभिनेत्रींसोबत अभिनेत्याचं नाव जोडण्यात आलं. अजयच्या खासगी आयुष्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये तुफान रंगलेल्या असतात. अजय याचं नाव अभिनेत्री करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. रवीना टंडन आणि अजय देवगण यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या.

रवीना टंडन आणि अजय देवगण यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. सिनेमांमध्ये एकत्र काम करत असताना त्यांचं नातं देखील भक्कम होत होतं. पण अभिनेत्याच्या आयु्ष्यात अभिनेत्री करिश्मा कपूर हिची एन्ट्री झाल्यानंतर अजय आणि रवीना यांच्यात वाद सुरु झाले. तेव्हा रवीना आणि अजय यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं होतं, तर दुसरीकडे करिश्माने नुकताच इंडस्ड्रीमध्ये पदार्पण केलं होतं.

१९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘जिगर’ सिनेमात अजय आणि करिश्मा यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अजय आणि करिश्मा यांच्यातील नातं नवं रुप घेत होतं. दोघांच्या नात्याचे किस्से अनेक मासिकांमध्ये देखील छापून येवू लागले. जेव्हा अजय आणि करिश्मा याच्या नात्याबद्दल रवीना हिला मोठा धक्का बसला.

अजय आणि करिश्मा नात्याची चर्चा जेव्हा रंगली होती, तेव्हा अभिनेत्याचं रवीना हिच्यासोबत ब्रेकअप झालं नव्हतं. शुटिंगनंतर अजय आणि करिश्मा तासन् तास फोनवर गप्पा मारायचे. अजय देवगण याच्यामुळे करीश्मा आणि रवीना यांच्यातील वाद टोक पोहोचले. एवढंच नाही तर, दोघी एकमेकींचं तोंड देखील पाहत नव्हत्या. दोघींमध्ये मारहाण देखील झाल्याच्या चर्चांनी जोर धरला.

पण एवढ्या मोठ्या प्रसंगानंतर अजय याने रवीना आणि करिश्मा दोघींपैकी एकीसोबतही लग्न न करता अभिनेत्री कजोल हिच्यासोबत लग्न केलं. जेव्हा करीश्मा आणि रवीना यांच्यामध्ये वाद सुरु होते, तेव्हा अजय आणि काजोल यांच्यामध्ये प्रेम बहरलं. अखरे अजय याने काजोल हिच्यासोबत लग्न केलं.

आज अभिनेता त्याच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री रवीना टंडन देखील तिच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. पण करिश्मा कपूर हिने खासगी आयुष्यात अनेक चढ – उतारांचा सामना केला. घटस्फोटानंतर करिश्मा कपूर दोन मुलांचा ‘सिंगल मदर म्हणून’ सांभाळ करत आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.