AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan: ‘कॉफी विथ करण 7’मध्ये आमिर खानने केली चूक, सोशल मीडियावर त्याची होतेय आलिया भट्टशी तुलना

या फेरीत जेव्हा करणने आमिरला भारतीय क्रिकेट संघातील तीन क्रिकेटपटूंची नावं विचारली तेव्हा आमिरने आधी विराट कोहलीचं नाव घेतलं. त्यानंतर तो रोहित शेट्टी म्हणतो.

Aamir Khan: 'कॉफी विथ करण 7'मध्ये आमिर खानने केली चूक, सोशल मीडियावर त्याची होतेय आलिया भट्टशी तुलना
Aamir Khan: 'कॉफी विथ करण 7'मध्ये आमिर खानने केली चूकImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 05, 2022 | 12:03 PM
Share

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचा सातवा सिझन (Koffee With Karan 7) सध्या चर्चेत आहे. या आठवड्यात ‘लाल सिंग चड्ढा’ची स्टार कास्ट आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) शोमध्ये पाहुणे म्हणून उपस्थित होते. चॅट शोमध्ये या दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. यादरम्यान आमिरसोबत असं काही घडलं की तो आता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. शोमध्ये त्याने अशा अनेक चुका केल्या आहेत ज्यामुळे त्याची तुलना आता आलिया भट्टशी होऊ लागली आहे. ‘कॉफी विथ करण 7’मध्ये करण जोहर पाहुणे म्हणून आलेल्या सेलिब्रिटींना विविध प्रश्न विचारतो. वैयक्तिक आयुष्य, सेक्स लाईफ यांबद्दलही तो मोकळेपणाने बोलतो. यादरम्यान अनेक खुलासे होतात, तर कधीही मस्करीही केली जाते. अनेकदा हे खुलासे चर्चेचा विषय बनतात. तर कधी त्यावरून वादही पेटतात. यावेळी आमिर खानसोबतही असंच काहीसं घडलं आहे.

करण जोहरच्या शोमध्ये आमिर खान आणि करीना कपूर खान हे एक गेम खेळत होते. यावेळी करण प्रश्न विचारत होता आणि ज्याला उत्तर माहित असेल तो लगेच बजर वाजवून उत्तर देत होता. या फेरीत जेव्हा करणने आमिरला भारतीय क्रिकेट संघातील तीन क्रिकेटपटूंची नावं विचारली तेव्हा आमिरने आधी विराट कोहलीचं नाव घेतलं. त्यानंतर तो रोहित शेट्टी म्हणतो. हे ऐकून करीना आणि करण दोघांनाही हसू अनावर होतं. त्यानंतर आमिरला त्याची चूक कळते आणि तो लगेच रोहित शर्माचं नाव घेतो आणि सॉरीही म्हणतो.

पहा व्हिडीओ 1-

ही चूक आमिरकडून एकदाच होत नाही. तर करणच्या दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर देतानादेखील तो गोंधळून जातो. करण आमिरला अक्षय कुमारच्या दोन चित्रपटांची नावं सांगण्यास सांगतो. याचं उत्तर देताना तो आधी ‘खिलाडी’ असं नाव घेतो आणि नंतर ‘सुपर 30’ म्हणतो. ‘सुपर 30’ हा अक्षयचा नाही तर हृतिक रोशनचा चित्रपट होता. या एपिसोडनंतर आमिर खान सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. तिची क्लिप व्हायरल होत असून त्याची तुलना आलिया भट्टशी केली जात आहे. आलिया याआधी जेव्हा ‘कॉफी विथ करण’मध्ये आली होती, तेव्हा भारताच्या राष्ट्रपतींचं नाव विचारलं असता तिने पृथ्वीराज चव्हाण असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली गेली होती.

पहा व्हिडीओ 2-

आमिर आणि करीनाच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, ‘लाल सिंह चड्ढा’चं दिग्दर्शन अद्वैत चंदनने केलं आहे. हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. यात आमिर आणि करीना व्यतिरिक्त साऊथ स्टार नागा चैतन्य आणि टीव्ही अभिनेत्री मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.