AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगनानंतर क्रिती सनॉन करणार राजकारणात प्रवेश? म्हणाली “जर एकेदिवशी..”

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सेलिब्रिटी राजकारणात प्रवेश करत आहेत. कंगना राणौत, अरुण गोविल, गोविंदा यांसारख्या कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. आता अभिनेत्री क्रिती सनॉनने राजकारणात जाण्याविषयी तिचं मत मांडलं आहे.

कंगनानंतर क्रिती सनॉन करणार राजकारणात प्रवेश? म्हणाली जर एकेदिवशी..
Kriti SanonImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 29, 2024 | 10:47 AM
Share

लोकसभा निवडणुका तोंडावर असताना कलाविश्वातील बरेच सेलिब्रिटी राजकारणात प्रवेश करत आहेत. अभिनेत्री कंगना राणौतनेही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तर गुरुवारी अभिनेता गोविंदा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यानंतर आता अभिनेत्री क्रिती सनॉनला राजकारणात पाऊल ठेवणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. एका समिटदरम्यान क्रितीला राजकारणाविषयी तिचं मत मांडण्यास सांगण्यात आलं होतं. यावेळी क्रिती मोकळेपणे व्यक्त झाली.

“मी कधीच त्याचा विचार केला नाही. जोपर्यंत मला मनापासून एखादी गोष्ट आवडत नाही किंवा माझी मानसिक तयारी होत नाही तोपर्यंत मी कधीच हे करेन किंवा ते करेन असं ठरवत नाही. जर एकेदिवशी माझ्या मनात आलं की मला यापेक्षा काही अधिक करायचं आहे, तर तेव्हा नक्की करेन. ठराविक वेळेनंतर गिअर शिफ्ट केली पाहिजे आणि ज्या गोष्टी आपण आधी केल्या नाहीत, त्या करण्याचं आव्हान स्वीकारलं पाहिजे”, असं क्रिती म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रितीच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास तिचा ‘क्रू’ हा चित्रपट आजच (29 मार्च) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. यामध्ये क्रितीसोबतच तब्बू आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. राजेश ए. कृष्णन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. तब्बू आणि करीनासोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी बोलताना क्रिती म्हणाली, “आम्ही सहसा पुरुषांसोबत काम करतो. पण महिलांसोबत काम करण्याचा अनुभव मनाला ताजंतवानं करणार आहे. तब्बू आणि करीना अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री आहेत. त्यांच्याकडून मला बरंच शिकायला मिळालं.”

अभिनेत्री कंगना राणौत भाजपकडून हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. 23 मार्च रोजी भाजपकडून 111 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये कंगनाशिवाय अभिनेते अरुण गोविल यांचाही समावेश होता. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत त्यांनी श्रीराम यांची भूमिका साकारली होती. मेरठ या मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.