AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटच्या क्षणी ‘या’ अभिनेत्रीची अत्यंत वाईट अवस्था; पाणी पाजण्यासाठी देखील नव्हतं कोणी जवळ

अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात केलं घर, चाहत्यांची संख्या मोठी असताना देखील शेवटच्या क्षणी अभिनेत्री जवळ पाणी पाजण्यासाठी देखील कोणीही नव्हतं, झाली होती प्रचंड वाईट अवस्था

शेवटच्या क्षणी 'या' अभिनेत्रीची अत्यंत वाईट अवस्था; पाणी पाजण्यासाठी देखील नव्हतं कोणी जवळ
| Updated on: Feb 24, 2023 | 12:01 PM
Share

Lalita Pawar Death Anniversary : आयुष्यात कधी काय होईल कोणीही सांगू शकत नाही. बॉलिवूड कलाकारांसोबत देखील अनेक अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे त्यांच्या स्वप्नांना ब्रेक लागला. पण तरी देखील कलाकारांनी हार मानली नाही. स्वप्न पूर्ण झाले नसले तरी त्यांनी प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं आहे. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री ललिता पवार (Lalita Pawar). आज ललिता पवार आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आठवणी कायम चाहत्यांना प्रेरणा देतात. ललिता पवार यांना बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची होती. पण त्यांचं हे स्वप्न कधीही पूर्ण झालं नाही. (Lalita Pawar Death Anniversary)

१९४२ साली जेव्हा ‘जंग-ए-आजादी’ सिनेमाची शुटिंग सुरु होती. सिनेमातील एका सीनमध्ये अभिनेते भगवान दादा यांना ललिता पवार यांच्या जोरात कानशिलात मारायची होती. तेव्हा भगवान यांनी जोरात ललिता यांच्या कानशिलात लगावली आणि अभिनेत्रीच्या कानाच्या पडद्यांना मोठा त्रास झाला. यामुळे ललिता पवार यांच्या डोळ्यांना देखील दुखापत झाली.

एवढंच नाही तर, उपचार चुकीचे झाल्यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली. ललिता यांच्या शरीराचा एक भाग निकामी झाला. एवढी मोठी घटना घडल्यानंतर कोणीही खचून जाईल. पण ललिता पवार यांनी हार मानली नाही. या अवस्थेवर मात करण्यासाठी त्यांना मोठा कालावधी लागला आणि त्यांनी पुन्हा झगमगत्या विश्वात पदार्पण केलं. (lalita pawar marathi movie list)

ललिता पवार यांचं अभिनेत्री होण्याचं स्वप्न तर पूर्ण झालं नाही, पण रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत त्यांनी साकारलेल्या मंथरा भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांची मंथरा भूमिका आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. ललिता पवार यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले.

ललिता पवार यांचं लग्न गणपतराव पवार यांच्यासोबत झालं होतं. पण गणपतराव यांनी पत्नीची फसवणूक केली. कालांतराने गणपतराव यांचं जीव ललिता यांच्या लहान बहिणीवर जडला. त्यानंतर ललिता यांनी राजप्रकाश गुप्ता यांच्यासोबत लग्न केलं. दोन लग्न होवून देखील ललिता यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं. (lalita pawar husband)

ललिता जेव्हा शेवटचा श्वास घेत होत्या, तेव्हा त्या बंगल्यात एकट्या होत्या आणि त्यांचे पती रुग्णालयात दाखल होते. तेव्हा ललिता यांना शेवटच्या क्षणी पाणी पाजण्यासाठी देखील कोणीही नव्हतं. अखेर २४ फेब्रुवारी १९८८ साली ललिता पवार यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती तीन दिवसांनंतर मिळाली, जेव्हा पोलिसांनी त्यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडला तेव्हा त्या मृत अवस्थेत आढळल्या.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.