AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटच्या क्षणी ‘या’ अभिनेत्रीची अत्यंत वाईट अवस्था; पाणी पाजण्यासाठी देखील नव्हतं कोणी जवळ

अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात केलं घर, चाहत्यांची संख्या मोठी असताना देखील शेवटच्या क्षणी अभिनेत्री जवळ पाणी पाजण्यासाठी देखील कोणीही नव्हतं, झाली होती प्रचंड वाईट अवस्था

शेवटच्या क्षणी 'या' अभिनेत्रीची अत्यंत वाईट अवस्था; पाणी पाजण्यासाठी देखील नव्हतं कोणी जवळ
| Updated on: Feb 24, 2023 | 12:01 PM
Share

Lalita Pawar Death Anniversary : आयुष्यात कधी काय होईल कोणीही सांगू शकत नाही. बॉलिवूड कलाकारांसोबत देखील अनेक अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे त्यांच्या स्वप्नांना ब्रेक लागला. पण तरी देखील कलाकारांनी हार मानली नाही. स्वप्न पूर्ण झाले नसले तरी त्यांनी प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं आहे. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री ललिता पवार (Lalita Pawar). आज ललिता पवार आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आठवणी कायम चाहत्यांना प्रेरणा देतात. ललिता पवार यांना बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची होती. पण त्यांचं हे स्वप्न कधीही पूर्ण झालं नाही. (Lalita Pawar Death Anniversary)

१९४२ साली जेव्हा ‘जंग-ए-आजादी’ सिनेमाची शुटिंग सुरु होती. सिनेमातील एका सीनमध्ये अभिनेते भगवान दादा यांना ललिता पवार यांच्या जोरात कानशिलात मारायची होती. तेव्हा भगवान यांनी जोरात ललिता यांच्या कानशिलात लगावली आणि अभिनेत्रीच्या कानाच्या पडद्यांना मोठा त्रास झाला. यामुळे ललिता पवार यांच्या डोळ्यांना देखील दुखापत झाली.

एवढंच नाही तर, उपचार चुकीचे झाल्यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली. ललिता यांच्या शरीराचा एक भाग निकामी झाला. एवढी मोठी घटना घडल्यानंतर कोणीही खचून जाईल. पण ललिता पवार यांनी हार मानली नाही. या अवस्थेवर मात करण्यासाठी त्यांना मोठा कालावधी लागला आणि त्यांनी पुन्हा झगमगत्या विश्वात पदार्पण केलं. (lalita pawar marathi movie list)

ललिता पवार यांचं अभिनेत्री होण्याचं स्वप्न तर पूर्ण झालं नाही, पण रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत त्यांनी साकारलेल्या मंथरा भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांची मंथरा भूमिका आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. ललिता पवार यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले.

ललिता पवार यांचं लग्न गणपतराव पवार यांच्यासोबत झालं होतं. पण गणपतराव यांनी पत्नीची फसवणूक केली. कालांतराने गणपतराव यांचं जीव ललिता यांच्या लहान बहिणीवर जडला. त्यानंतर ललिता यांनी राजप्रकाश गुप्ता यांच्यासोबत लग्न केलं. दोन लग्न होवून देखील ललिता यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं. (lalita pawar husband)

ललिता जेव्हा शेवटचा श्वास घेत होत्या, तेव्हा त्या बंगल्यात एकट्या होत्या आणि त्यांचे पती रुग्णालयात दाखल होते. तेव्हा ललिता यांना शेवटच्या क्षणी पाणी पाजण्यासाठी देखील कोणीही नव्हतं. अखेर २४ फेब्रुवारी १९८८ साली ललिता पवार यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती तीन दिवसांनंतर मिळाली, जेव्हा पोलिसांनी त्यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडला तेव्हा त्या मृत अवस्थेत आढळल्या.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.