AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit ला ‘त्या’ किसिंग सीनचा आजही होतो पश्चाताप; स्वतःची लाज वाटल्यानंतर घेतला मोठा निर्णय…

माधुरी दीक्षित हिला आजही 'त्या' किसिंग सीनचा होतो पश्चाताप, म्हणाली, 'इंडस्ट्रीमध्ये नवीन असल्यामुळे मला...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या किसिंग सीनच्या चर्चा...

Madhuri Dixit ला 'त्या' किसिंग सीनचा आजही होतो पश्चाताप; स्वतःची लाज वाटल्यानंतर घेतला मोठा निर्णय...
| Updated on: May 15, 2023 | 10:27 AM
Share

मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही… फिल्मी कुटुंबातील नसून देखील माधुरी दीक्षित हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. आज अभिनेत्रीची ओळख बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध आहे. माधुरी हिने तिच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये जवळपास ७० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. माधुरीने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्रीने काही कौटुंबीक सिनेमांमध्ये काम केलं तर काही रोमाँटिक सिनेमांमध्ये देखील माधुरीने महत्त्वाची भूमिका साकारली. एका सिनेमात दिलेल्या किसिंग सीनचा अभिनेत्रीला आजही पश्चाताप होतो. १९९३ साली दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री यावर मोठा खुलासा केला होता.

१९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘दयावान’ सिनेमात अभिनेते विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांचा एक किसिंग सिन होता. सीन शूट करत असतात विनोद खन्ना यांचा स्वतःवरचा ताबा सुटला. तेव्हा माधुरी फक्त आणि फक्त २० वर्षांची होती. जेव्हा विनोद खन्ना यांना स्वतःच्या चुकुची जाणीव झाली तेव्हा त्यांनी माधुरीची माफी देखील मागितली.

शुटिंग दरम्यान विनोद खन्ना यांनी केलेल्या या कृत्यामुळे माधुरीला आजही पश्चाताप होतो. शुटिंग दरम्यान माधुरीला प्रचंड संकोचल्यासारखं वाटलं होतं. विनोद खन्ना माधुरीपेक्षा तब्बल २० वर्ष मोठे होते. म्हणून अनेकदा विचार करून विनोद खन्ना यांच्यासोबत इंटिमेट सीन करण्यासाठी माधुरी तयार झाली.

‘दयावान’ सिनेमाची चर्चा आजही चाहत्यांमध्ये तुफान रंगलेली असते. सिनेमातील किसिंग सीन मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होवू नये म्हणून अभिनेत्रीने दिग्दर्शकांकडे विनंती देखील केली. पण त्याचा काही फायदा झाला नाही. माधुरी इंडस्ट्रीमध्ये नवीन असल्यामुळे दिग्दर्शकांनी तिची एकही गोष्ट ऐकली नाही. जेव्हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला तेव्हा विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्या सीनमुळे अनेक चर्चा रंगल्या.

माधुरी दीक्षित हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ सिनेमानंतर अभिनेत्री एका रात्रीत स्टार झाली. त्यानंतर अभिनेत्रीने ‘दिल’, ‘खलनायक’, ‘साजन’, ‘बेटा’, ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘दिल तो पागल है’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये काम केलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.