AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मी जया अमिताभ बच्चन..”; राज्यसभेत पिकला एकच हशा, अध्यक्षही स्वत:ला रोखू शकले नाहीत

राज्यसभेत खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्यामुळे काही हलके-फुलके क्षण पहायला मिळाले. त्यांनी आपलं नाव घेताच अध्यक्षांनाही हसू अनावर झालं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मी जया अमिताभ बच्चन..; राज्यसभेत पिकला एकच हशा, अध्यक्षही स्वत:ला रोखू शकले नाहीत
Jaya Bachchan Image Credit source: ANI
| Updated on: Aug 04, 2024 | 11:13 AM
Share

राज्यसभेत शुक्रवारी जेव्हा खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी त्यांचं नाव घेतलं, तेव्हा संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांनी ज्या गोष्टीवरून आक्षेप घेतला होता, तीच गोष्ट सभागृहात करून त्या स्वत:तर हसल्याच, शिवाय त्यांनी सर्व सदस्यांना हसवलं. राज्यसभेतील हे हलके-फुलके क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी त्यांचा उल्लेख ‘जया अमिताभ बच्चन’ असा केला होता. त्यावर जया यांनी आक्षेप घेत “केवळ जया बच्चन म्हटलं असतं तरी चाललं असतं”, असं म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी स्वत:हून ‘जया अमिताभ बच्चन’ असा उल्लेख केल्यानंतर सभागृहात गमतीशीर वातावरण निर्माण झालं होतं.

जया बच्चन यांनी त्यांचं नाव घेताच राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलखुलास प्रतिक्रिया व्यक्त केली. ते हसले आणि त्यांच्यापाठोपाठ सभागृहातील इतरही खासदार हसले. यात काँग्रेसचे जयराम रमेश आणि आम आदमी पार्टीचे (आप) राघव चड्ढा यांचाही समावेश होता. यानंतर त्यांच्यात काही मजेशीर संवादसुद्धा झाला. जया बच्चन त्यांना म्हणाल्या, “तुम्ही आज लंच ब्रेक घेतला का? नाही? म्हणूनच तुम्ही जयरामजींचं नाव सारखं घेताय. त्यांचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला जेवण पचत नाही.” त्यावर धनखडसुद्धा तितक्याच हलक्याफुलक्या पद्धतीने उत्तर देतात. “मी तुम्हाला हलक्या-फुलक्या नोटवर सांगतो की, मी आज लंच ब्रेक घेतला नाही. पण जयरामजींसोबत मी जेवलो”, असं ते म्हणतात. हे ऐकल्यानंतर सभागृहात पुन्हा एकच हशा पिकतो. “मी तुम्हाला हेदेखील सांगू इच्छितो की मी तुमचा आणि अमिताभजींचा चाहता असण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल”, असंही धनखड पुढे म्हणतात.

पहा व्हिडीओ

याआधी जेव्हा जया बच्चन यांचा उल्लेख ‘जया अमिताभ बच्चन’ असा करण्यात आला, तेव्हा त्यांनी त्यावरून नाराजी व्यक्त केली होती. “हे काहीतरी नवीन आहे की, स्त्रिया त्यांच्या पतीच्या नावाने ओळखल्या जातील. जसं की त्यांचं स्वत:चं अस्तित्व किंवा कर्तृत्वच नाही”, असं त्यांनी बोलून दाखवलं. जया बच्चन या चित्रपट आणि राजकीय अशा दोन्ही क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी 3 जून 1973 रोजी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केलं. या दोघांना श्वेता आणि अभिषेक ही दोन मुलं आहेत.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!