AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mandala Murders Review: सचिन पिळगावकरांच्या लेकीची कमाल! काय आहे मंडाला मर्ड्सची कथा?

Mandala Murders Review: श्रिया पिळगावकरने 'मंडला मर्ड्स' सीरिजमधून जिंकली मने. 1 सेकंद जरी डोळे मिचकावले तर कळणार नाही सीरिजची कथा. वाचा काय आहे रहस्यमयी कथा

Mandala Murders Review: सचिन पिळगावकरांच्या लेकीची कमाल! काय आहे मंडाला मर्ड्सची कथा?
Mandala Murders ReviewImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 31, 2025 | 2:22 PM
Share

प्रेत साधना, काळ जादू, तंत्र-मंत्र यांसारख्या शक्तींवर कोणी विश्वास ठेवो वा न ठेवो, पण या गोष्टी आपल्या लोककथांचा भाग नक्कीच राहिल्या आहेत. आता या रहस्यमयी शक्तींची गाठ सामाजिक-राजकीय उलथापालथ आणि गुन्हेगारीशी जोडली गेली आहे. या त्रिकुटापासून तयार होते मंडला मर्डर्सची आश्चर्यकारक दुनिया. भूतकाळ आणि वर्तमानात झुलणारी अशी कथा जी कधी तुम्हाला गुंतवते, कधी चकित करते, पण शेवटपर्यंत बांधून ठेवते.

‘मंडला मर्डर्स’ची कथा

कथा 1950 च्या दशकात उत्तर प्रदेशातील काल्पनिक गाव चरणदासपूर येथून सुरू होते. तेील काही स्त्रिया विचित्र टोटक्यांनी मृत व्यक्तीला जिवंत करण्याचा प्रयत्न करत असतात. गावकरी त्यांचा ठिकाणा जाळून खाक करतात आणि त्यांचे मनसुबे उधळून लावतात. त्यानंतर कथा आजच्या काळात परत येते. तेथे दिल्ली पोलिसांचा निलंबित अधिकारी विक्रम सिंह (वैभव राज गुप्ता) आपल्या वडिलांसोबत (मनु ऋषि चड्ढा) आपल्या गावी चरणदासपूरला जात असतो. ट्रेनमध्ये त्याची भेट एका प्रेस फोटोग्राफरशी होत. त्या धड कापलेल मृतदेह दुसऱ्या दिवशी नदीत तरंगताना सापडतो.

वाचा: महाराष्ट्र हादरला! महिलांना जंगलात नेऊन संबंध ठेवायचा, इच्छा पूर्ण होताच बनायचा यमराज; असा क्रूर खूनी कधी पाहिला नसेल

या क्रूर खुनामुळे गावात दहशत पसरते आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयबी (सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) ची सक्षम अधिकारी रिया थॉमस (वाणी कपूर) पोहोचते. रिया स्वतः आपल्या भूतकाळातील एका भीतीशी झुंजत असते. त्यामुळे तिला फील्डवरून डेस्कवर हलवण्यात आले आहे. तरीही रिया हट्ट करुन ही केस हाती घेते. तपास सुरू करते आणि त्याचवेळी दोन नेत्याचीही अशीच भयंकर हत्या होत. या नेत्यांचे दोन्ही हात कापून त्यांना मारण्यात आले असते. याचा संशय त्यांच्या विरोधी नेत्या अनन्या भारद्वाज (सुरवीन चावला) यांच्यावरही जातो.

जसजसा तपास पुढे सरकतो, तसतसे एक वेगळच आश्चर्यकारक आणि गूढ असलेल्या जगाच उलगडा होतो. एक गुप्त समाज आयस्त मंडलाचा खुलासा होतो. त्यांच्याकडे एक यंत्र आहे, ज्याद्वारे ते हाताच्या अंगठ्याच्या बदल्यात लोकांना हवे ते वरदान देतात. या मंडलाचा हेतू काय आहे? या हत्यांमागे कोणाचा हात आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सीरिज पाहावी लागेल.

‘मंडला मर्डर्स’ पुनरावलोकन

लेखक महेंद्र जाखड यांच्या ‘द बुचर्स ऑफ बनारस’ या पुस्तकावर आधारित ही कथा आस्था, धर्म, विज्ञान, गुन्हेगारी, राजकारण यांचे रोचक मिश्रण आहे. आयस्तींची रहस्यमयी आणि रोमांचक दुनिया शेवटपर्यंत बांधून ठेवते. प्रत्येक पात्राचा स्वतःचा भूतकाळ आहे, त्याच्याशी जोडलेले एक रहस्य आहे, ज्यामुळे सस्पेन्स कायम राहतो आणि तुम्हाला पुढे पाहण्यासाठी भाग पाडले जाते.

मात्र, अनेक पात्र एकमेकांत गुंतलेले असणे आणि पुढे-मागे होणारी टाइमलाइन यामुळे कथा खूपच गुंतागुंतीची झाली आहे. जर लक्ष चुकले तर गोष्टी समजण्यापलीकडे जाऊ शकतात. याशिवाय, तपासाचा भाग कमकुवत वाटतो. अशा भयंकर साखळी हत्यांनंतरही प्रशासनापासून ते मीडियापर्यंत तशी खळबळ दिसत नाही, ज्यामुळे या घटना विश्वासार्ह वाटत नाहीत.

‘मंडला मर्डर्स’ कलाकार

अभिनयाबद्दल बोलायचे तर, वाणी कपूरने यासह ओटीटीवर पदार्पण केले आहे आणि तिने आपली भूमिका सहजतेने साकारली आहे. फक्त तिचे अ‍ॅक्शन सीन कोरियोग्राफ वाटतात, खरे वाटत नाहीत. तर, विक्रमच्या भूमिकेत वैभव राज गुप्ता यांनी अखेरीस गुल्लकच्या अन्नू मिश्राला विसरण्यात यश मिळवले आहे. वैभवने सध्या अभिनय केला आहे. हेच सुरवीन चावलावरही लागू होते, जी अनन्याच्या भूमिकेला आकर्षक बनवते. इतर कलाकारांमध्ये जामील खान, रघुबीर यादव, श्रेया पिगावकरचाही अभिनय चांगला आहे.

तांत्रिक बाजूबद्दल बोलायचे तर, सेटिंग, प्रॉडक्शन डिझाइन, सिनेमेटोग्राफी, पार्श्वसंगीत हे भयंकर वातावरण तयार करण्यात यशस्वी ठरतात, जे अशा मालिकेसाठी आवश्यक आहे. काय पाहावे- जर तुम्हाला वेगळ्या प्रकारचा थ्रिलर पाहायचा असेल, तर ओटीटीवरील ही नवी मालिका तुमची पसंती बनू शकते.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.