AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र हादरला! महिलांना जंगलात नेऊन संबंध ठेवायचा, इच्छा पूर्ण होताच बनायचा यमराज; असा क्रूर खुनी कधी पाहिला नसेल

महाराष्ट्रातील जळगाव परिसरात पोलिसांनी एका सीरियल किलरला पकडलं आहे. हा आरोपी विवाहित महिलांना आपलं लक्ष्य बनवायचा. चला, तुम्हाला या सीरियल किलरची संपूर्ण कहाणी सांगतो...

महाराष्ट्र हादरला! महिलांना जंगलात नेऊन संबंध ठेवायचा, इच्छा पूर्ण होताच बनायचा यमराज; असा क्रूर खुनी कधी पाहिला नसेल
Crime newsImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 29, 2025 | 4:42 PM
Share

आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीची कहाणी सांगणार आहोत, जो प्रथम विवाहित महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि नंतर त्यांचे जीव घ्यायचा. या भयंकर खुन्याचं नाव आहे अनिल सदाशिव. चला, तुम्हाला या क्रूर व्यक्तीची संपूर्ण कहाणी सांगतो.

नेमकं काय करायचा?

अनिल, एक चतुर आणि क्रूर शिकारी, जो आपलं शिकार अत्यंत शातिरपणे निवडायचा. त्याचं लक्ष्य होत्या विवाहित महिला. तो प्रथम त्यांच्याशी मैत्री करायचा, गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि हळूहळू त्यांच्या मनात स्थान मिळवायचा. त्याच्या मधुर बोलण्याने आणि खोट्या आश्वासनांनी महिला कोणत्याही संशयाशिवाय त्याच्या जाळ्यात अडकायच्या. त्यानंतर अनिल या महिलांना निर्जन जंगलात किंवा डोंगराळ भागात घेऊन जायचा.

वाचा: मुलापासून मुलगी बनलेल्या अनया बांगरचा जलवा, हे फोटो पाहून तुम्हीही चकीत व्हाल

तिथे तो प्रथम त्यांची लूटमार करायचा, मग त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि शेवटी दगडांनी ठेचून त्यांची हत्या करायचा. मृतदेह तो जंगलाच्या खोलवर लपवायचा, जेणेकरून कोणताही पुरावा मिळू नये.

तिसऱ्या शिकारीची तयारी करत होता

अनिलचा हे भयंकर काम तेव्हापर्यंत चालू होते, जोपर्यंत एका महिलेने त्याच्या क्रूरतेचा पर्दाफाश केला नाही. त्या दिवशी अनिलने आणखी एका महिलेला आपल्या जाळ्यात फसवलं होतं. तो तिला एका निर्जन जंगलात घेऊन गेला, जिथे त्याने आपले खरे हेतू उघड केले. पण यावेळी त्याचं नशीब त्याला साथ देईना. जेव्हा त्याने त्या महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या महिलेने धैर्य दाखवलं आणि त्याच्या पकडीतून सुटून पळण्यात यश मिळवलं. तिची ओरड ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ धावत घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांनी अनिलला घेरलं आणि त्याला पकडलं. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि अनिलला ताब्यात घेण्यात आलं.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं समजलं की, अनिलने गेल्या एका महिन्यात किमान दोन महिलांची हत्या केली होती. त्याने दोन्ही मृतदेह जंगलात फेकले होते, जिथे पोलिसांनी शोध घेतल्यानंतर दोन मृतदेह सापडले.

पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितलं की, सर्वप्रथम जून महिन्यात शोभाबाई रघुनाथ कोळी यांचा मृतदेह सापडला होता. तपासात अनिल संदनशिव याला अटक झाली, ज्याने आपला गुन्हा कबूल केला. विशेष म्हणजे, पोलिसांनी त्याला तिसऱ्या हत्येचा प्रयत्न करताना रंगेहाथ पकडलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.