AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रींना स्पर्शही करायचे नाहीत मनोज कुमार; काय होतं कारण?

1960 च्या दशकात कारकिर्दीच्या शिखरावर असलेले मनोज कुमार यांचे निधन झाले. दरम्यान, त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आजही एक आदर्श बनल्या आहेत. यापैकी एक म्हणजे त्यांनी कधीही अभिनेत्रींनी स्पर्श करणे टाळले आहे. पण का? कारण जाणून आश्चर्य वाटेल.

अभिनेत्रींना स्पर्शही करायचे नाहीत मनोज कुमार; काय होतं कारण?
Manoj Kumar doesn't even want to touch actressesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 04, 2025 | 8:04 PM
Share

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज 4 एप्रिल 2025 रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांनी फिल्म इंडस्ट्रीसाठी खूप योगदान दिलं आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या चित्रपटांनी लोकांच्या मनावर राज्य केलं.

मनोज कुमार हे एक अतिशय प्रभावशाली अभिनेते होते

मनोज कुमार यांचे नाव महान कलाकारांमध्ये गणले जाते. ते अशा अभिनेत्यांपैकी एक होते ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि प्रतिमेने चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. मनोज कुमार हे एक अतिशय प्रभावशाली अभिनेते होते जे 1970 च्या दशकात त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचले. त्यांनी चित्रपटसृष्टीत एक असा आदर्श ठेवला जो नेहमीच लक्षात राहील. मनोज कुमार हा एक असा अभिनेता होता जो पडद्यावर नायिकेला स्पर्श करणे टाळत असे. होय ते अभिनेत्रींना स्पर्श करणं टाळण्याचा प्रयत्न करायचे.

 प्रतिमा जपणं हे त्यांच्यासाठी फार महत्वाचं होतं.

मनोज कुमार यांचे पडद्यावरचे व्यक्तिमत्व खूप खास होते. त्यांनी नेहमीच त्यांच्या पात्रांमध्ये भारतीयत्व, देशभक्ती आणि साधेपणा जपला. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये भारताच्या प्रतिमेला प्राधान्य दिले. मनोज कुमार कोणत्याही चित्रपटात त्यांच्या नायिकांशी अंतर ठेवत असे.मनोज कुमार यांना त्यांची प्रतिमा जपणं हे त्यांच्यासाठी फार महत्वाचं होतं.

अभिनेत्रीसोबत रोमँटीक सीन करणं टाळले 

त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की एखाद्या अभिनेत्रीला स्पर्श करणारा सीन करणे योग्य ठरणार नाही. त्यांना आपला अभिनय हा पडद्यावर दाखवलेल्या समाज आणि देशाच्या आदर्शांचे प्रतीक बनावा अशी त्याची इच्छा होती. हे लक्षात घेऊन, त्यांनी 1974 मध्ये आलेल्या ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटातील एका विशिष्ट दृश्याच्या शूटिंग दरम्यान एक रोमँटिक दृश्य करण्यास नकार दिला. यामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल,असं म्हणत त्यांनी पडद्यावर रोमँटीक सीन करणे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.