‘बस झालं! यापेक्षा जास्त सहन करणं शक्य नाही,’ अक्षय वाघमारेनं सोशल मीडियावर मांडला महत्त्वाचा मुद्दा

फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तीन चित्रपटांनंतर शेर शिवराज (Sher Shivraj) हा 'शिवराज अष्टकातील' हा चौथा चित्रपट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अफजलखानाच्या वधाची गोष्ट यात दाखवण्यात आली आहे.

'बस झालं! यापेक्षा जास्त सहन करणं शक्य नाही,' अक्षय वाघमारेनं सोशल मीडियावर मांडला महत्त्वाचा मुद्दा
Akshay WaghmareImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 9:26 AM

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय, मात्र थिएटरमध्ये प्राइम टाइम शोज (Prime Time) मिळत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शोज मिळावे, यासाठी आधीही अनेक कलाकारांनी आवाज उठवला. आता ‘शेर शिवराज’च्या निमित्ताने अभिनेता अक्षय वाघमारेनं (Akshay Waghmare) हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. ‘जाहीर निषेध’ म्हणत त्याने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था महाराष्ट्रात आहे, तर इतर चित्रपटांबद्दल बद्दल काय बोलणार,’ अशा शब्दांत त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तीन चित्रपटांनंतर शेर शिवराज हा ‘शिवराज अष्टकातील’ हा चौथा चित्रपट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अफजलखानाच्या वधाची गोष्ट यात दाखवण्यात आली आहे.

अक्षय वाघमारेची पोस्ट-

‘नमस्कार पोस्ट मोठी आहे पण अत्यंत महत्वाची आहे. मराठी चित्रपट आणि प्राईम टाईम. मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. याविषयी यापूर्वी देखील अनेकदा बोलले गेले आहे, पण पुढे काहीच साध्य झाले नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा ऐतिहासिक चित्रपट ‘शेर शिवराज’ हा गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि आता शेर शिवराज असे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यामागे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा एकच उद्देश होता की महाराजांचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचायला हवा, नवीन पिढीला स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा. स्वराज्याची स्थापना ते परकियांचे आक्रमण या आणि अनेक बाबी या चित्रपटांद्वारे मांडल्या गेल्या आहेत आणि मराठी जनतेने उत्स्फुर्तपणे या सर्व चित्रपटांना प्रतिसाद दिला. आतासुद्धा महाराष्ट्रातील जनता शेर शिवराज हा चित्रपट पाहू इच्छिते पण तरी बघू शकत नाही किंवा त्यांना बघू दिला जात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शोचे वेळापत्रक अर्थात शो टाइम्स. सगळे प्राईम टाइम्स हे हिंदी चित्रपटांना प्राधान्याने दिले जातात आणि त्या वेळेला तिथे मराठी चित्रपट नसतो, त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात धोक्यात आलेली आहे. चित्रपटाच्या निर्मितीमागे असंख्य हात लागलेले असतात. या चित्रपटसृष्टीत अनेक लोकांचे उत्पन्न अवलंबून आहेत. या सगळ्याचा विचार कोण करणार? आपल्याच राज्यात राहून आपल्या मराठी भाषेची गळचेपी होत असेल तर या संदर्भात आवाज उठवायला नको का? जी व्यवस्था हे सगळं बघत आहेत त्यांनी याविषयी काहीतरी धोरण अवलंबणार आहेत की नाही? नाहीतर इथून पुढे मराठी चित्रपट निर्मिती करताना निर्मातेदेखील १० वेळा विचार करतील आणि अनेक लोक बेरोजगार होतील. मराठी माणसाने म्हणजे सन्मानीय दादासाहेब फाळके यांनी ही चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि याच राज्यात मराठी चित्रपटांचे असे हाल होत आहेत. जर निर्मात्यांचे अशा प्रकारे नुकसान होणार असेल तर आम्ही कलाकारांनी देखील का काम करावे हा पण एक प्रश्न आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था महाराष्ट्रात आहे. तर इतर चित्रपटांबद्दल बद्दल काय बोलणार? बस झालं यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही. मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्रात झालाच पाहिजे. प्राइम टाइम आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे.’ अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.

इन्स्टा पोस्ट-

‘शेर शिवराज चांगली गर्दी खेचत असूनही चित्रपटाला मुंबईत प्राइम टाइम शोज मिळत नाहीत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी ही गोष्ट लक्षात आणून दिल्यावर मनसेतर्फे चित्रपटगृह मालकांना निवेदन देण्यात येत आहे. समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करावंच लागेल,’ असा इशारा याआधी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला होता. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनेही या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं म्हटलंय. तसंच या चित्रपटाच्या व्यवसायामध्येही वाढ होत असल्याचं म्हटलंय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने एक कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.