AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सनी देओलसोबत किसिंग सीन केला पण.. मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला ‘तो’ खास किस्सा

मिनाक्षीने राजकुमार संतोषी यांच्यासोबत फिस्कटलेल्या लग्नाचीही सांगितली गोष्ट..

सनी देओलसोबत किसिंग सीन केला पण.. मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला 'तो' खास किस्सा
मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला 'तो' खास किस्सा Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 17, 2022 | 1:33 PM
Share

मुंबई: ‘दामिनी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाका करणारी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री आठवतेय का? 90 च्या दशकातील लोकप्रिय आणि टॉपच्या अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होता. अमिताभ बच्चन ते विनोद खन्ना यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत तिने काम केलं. मात्र करिअरच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मीनाक्षीने लग्न केलं आणि फिल्म इंडस्ट्री सोडून अमेरिकेत स्थायिक झाली. मीनाक्षीने 1995 मध्ये लग्नानंतर बॉलिवूडला रामराम केला. आता पुन्हा ती भारतात परतली आहे. भारतात आल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा बोलून दाखवली.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मीनाक्षी तिच्या चित्रपटांविषयी आणि खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. मीनाक्षी सध्या पुण्यात राहतेय, तर तिचे पती आणि मुलं अमेरिकेत राहत आहेत.

या मुलाखतीत तिने अभिनेता सनी देओलसोबतच्या किसिंग सीनचा उल्लेख केला. “डकैत या चित्रपटात माझा आणि सनीचा किसिंग सीन होता. त्यावेळी सनीने अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने तो सीन हाताळला. याचं संपूर्ण श्रेय मी त्याला देईन. त्याच्यामुळेच मी कम्फर्टेबल होते. मात्र नंतर सेन्सॉरने तो सीन चित्रपटातून काढून टाकला”, असं मीनाक्षीने सांगितलं.

मीनाक्षी तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली होती. दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना मीनाक्षीसोबत लग्न करायचं होतं. या फिस्कटलेल्या लग्नाची गोष्टसुद्धा तिने सांगितली. एके दिवशी राजकुमार संतोषी हे अचानक काही लोकांना विमानातून कोलकाताला घेऊन गेले आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते मीनाक्षीसोबत लग्न करणार होते, अशी चर्चा त्यावेळी झाली होती.

लग्नाच्या चर्चांवर मीनाक्षी म्हणाली, “ज्यावेळी ती चर्चा झाली तेव्हा यश चोप्रा आणि अमजद खान यांनी पुढाकार घेत आधी ‘दामिनी’ हा चित्रपट पुन्हा ट्रॅकवर आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संतोषी आणि मीसुद्धा निर्णय घेतला की घडलेल्या सगळ्या गोष्टी मागे सोडत दामिनी हा चित्रपट सर्वोत्कृष्ट बनवण्यावर लक्ष केंद्रीत करायचं. ज्या काही खासगी चर्चा झाल्या असतील, असं झालं, तसं झालं.. आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की यावर प्रतिक्रिया द्यायची नाही आणि हीच सर्वांत चांगली गोष्ट होती. असंच करणं योग्य होतं. पुढे मी लग्न केलं आणि माझं आयुष्य जगू लागले. त्यांनीसुद्धा लग्न केलं आणि त्यांच्या आयुष्यात पुढे गेले.”

दामिनी या चित्रपटानंतरही मीनाक्षी आणि राजकुमार संतोषी यांनी ‘घातक’ चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. खासगी आयुष्यात काहीही घडलं तरी कामावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही हे दोघांनी ठरवलं होतं, असं मीनाक्षीने स्पष्ट केलं.

मीनाक्षीने इन्वेस्टमेंट बँकर हरिष मैसूर यांच्याशी लग्न केलं. या दोघांना 24 वर्षांची केंड्रा ही मुलगी आणि 20 वर्षांचा जॉश हा मुलगा आहे.

Follow Us
नाशिकचा गंगापूर रोड खचला; सिटीलिंक बससह वाहने अडकली, नेमकं काय घडलं?
Nashik Rain News | नाशिकचा गंगापूर रोड खचला; सिटीलिंक बससह अनेक वाहने अडकली, नेमकं काय घडलं?
सगळीकडे पाणीच पाणी! पुण्यात हाहाकार... मुसळधार पावसामुळे 27 हजार 100
सगळीकडे पाणीच पाणी! पुण्यात हाहाकार... मुसळधार पावसामुळे 27 हजार 100 क्युसेकने विसर्ग सूरु
एकाला वाचवायला गेले..पण चौघांचाही जीव गेला! एकाच कुटुंबावर काळाचा घाला
मोठी बातमी! एकाला वाचवायला गेले... पण चौघांचाही जीव गेला! साताऱ्यात एकाच कुटुंबावर काळाचा घाला
मुंबईच्या मढ किनाऱ्याजवळ संशयित जहाज!; कोणत्या देशाचे? काय आहे आत?
Mumbai | मुंबईच्या मढ किनाऱ्याजवळ संशयित जहाज!; कोणत्या देशाचे? काय आहे आत? तपास सुरू
भिडे पूल पाण्याखाली; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Pune Rain | भिडे पूल पाण्याखाली; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर