AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमामुळे नाही तर..; नीना गुप्ता यांनी सांगितलं लग्न करण्यामागचं प्रामाणिक कारण

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न करण्यामागचं अत्यंत प्रामाणिक कारण सांगितलं आहे. नीना आणि विवियन रिचर्ड्स यांचं नातं जगजाहीर होतं. या नात्यातून त्यांना मसाबा ही मुलगी आहे. त्यानंतर नीना गुप्ता यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.

प्रेमामुळे नाही तर..; नीना गुप्ता यांनी सांगितलं लग्न करण्यामागचं प्रामाणिक कारण
Neena Gupta and Vivek MehraImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 18, 2026 | 1:24 PM
Share

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांचं खासगी आयुष्य हे जणू खुल्या किताबाप्रमाणेच आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्याशी ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यातून त्यांना एक अपत्यसुद्धा आहे. परंतु विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांनी लग्न केलं नाही. कारण त्यावेळी विवियन हे आधीच विवाहित होते आणि ते त्यांच्या पत्नी, कुटुंबाला सोडू इच्छित नव्हते. तर बाळाला जन्म द्यायचा की नाही, याचा निर्णय त्यांनी नीना यांच्यावर सोपवला होता. नीना यांनी त्या कठीण परिस्थितीतही बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता आणि लेक मसाबाचं त्यांनी एकटीने संगोपन केलं. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या विवेक मेहरा यांच्याशी लग्न करण्यामागचं कारण सांगितलं. चार्टर्ड अकाऊंटंट विवेक यांच्याशी प्रेमामुळे नाही तर परिस्थितीमुळे लग्न केल्याचं त्यांनी मान्य केलं.

शुभांकर मिश्राला दिलेल्या या मुलाखतीत नीना यांना विचारलं गेलं की, “तुम्ही प्रेमामुळे एकमेकांशी लग्न केलं का?” त्यावर स्मितहास्य करत नीना म्हणाल्या, “हा खूप कठीण प्रश्न आहे. मला प्रेम समजत नाही. मला फक्त माझ्या मुलीवर असलेलं प्रेम समजतं. त्याशिवाय मला बाकी काहीच समजत नाही.” हे ऐकल्यानंतर शुभांकरने त्यांना विवेक मेहरा यांच्याशी लग्न करण्यामागचं कारण विचारलं. त्यावर त्यांनी अत्यंत प्रामाणिक उत्तर दिलं.

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

“गरज होती, खूप. जर आपल्याला समाजात राहायचं असेल तर समाजाच्या काही नियमांचं पालन करावं लागतं. ही गोष्ट मी माझ्या चुकांमधून शिकले. एकतर तुम्ही आयलँडवर राहा किंवा मग तुम्ही तुमच्या मर्जीने जगा. इथे मी जसा विचार करते, तसाच बाकीचे करत नाहीत. मी कुठेही गेले तरी माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं जातं. त्यामुळे मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. लग्न करा.. सर्वकाही ठीक होईल. ही खूप दु:खद बाब आहे, पण हेच सत्य आहे”, अशा शब्दांत नीना गुप्ता व्यक्त झाल्या.

नीना यांनी पुढे असंही स्पष्ट केलं की, जरी लग्न हे महत्त्वाचं असल्याचं त्या मानत असल्या तरी त्याचा अर्थ कोणाशीही लग्न करावं असा होत नाही. परंतु आपल्या समाजात एखाद्या महिलेनं एकटं राहणं खूप कठीण असल्याचं त्या म्हणाल्या.

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.