धक्कादायक, कालव्यात सापडला प्रसिद्ध गायिकेचा मृतदेह, कुटुंबियाचा कोणावर आरोप?
5 दिवस गायब असलेल्या प्रसिद्ध गायिकेचा कालव्यात आढळला मृतदेह, अपहरणानंतर हत्या केल्याचा आरोप, कुटुंबियांनी कोणाला धरलं धरेवर? 'त्या' 5 दिवसांत नेमकं काय काय घडलं?

झगमगत्या विश्वातून कधी कोणती धक्कादायक बातमी समोर येईल सांगता येत नाही. आता देखील पंजाबी संगीत विश्वातून एक मन विचलित करणारी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायिका इंदर कौर (Inder Kaur) हिची हत्या करण्यात आली आहे आणि यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना गायिकेला श्रद्धांजली वाहिली आहे. हैराण करणारं सत्य म्हणजे, जवळपास 5 दिवसांपूर्वी गायिकेचं अपहरण करण्यात आलं होतं. आता तिचा मृतदेह एका कालव्यात आढळला आहे… जाणून घ्या नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण…
इंदर कौर हिचा कालव्यात आढळला मृतहेद
पंजाबी सिंगर इंदर कौर (Punjabi Singer Inder Kaur) उर्फ यशइंदर कौर हिची हत्या करण्यात आली आहे. 19 मे रोजी सकाळी 11 वजता इंदर हिचा मृतदेह एका कालव्यात आढळला. ज्याची ओळख कुटुंबियांनी केली. सध्या गायिकेचा मृतदेह रुग्णालयात आहे… गायिकेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदर 13 मे रोजी रात्री 8.30 वाजता कारमधून सामान घेण्यासाठी बाहेर निघाली होती. पण रात्र झाल्यानंतर देखील घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केला. पण पाच दिवसांनंतर गायिकेचा मृतदेह कालव्यात आढळला.
लग्न करण्याचे आरोप…
मिळालेल्या माहितीनुसार, इंदर कौर हिच्या कुटुंबियांचे आरोप आहेत की, सुखविंदर सिंह उर्फ सुक्खा याने इंदर हिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता, पण तिने लग्नासाठी नकार दिल्याने सुखविंदर याने मित्रांच्या मदतीने इंदर हिचं अपहरण केलं आणि त्यानंतर तिची हत्या केली. कुटुंबियांच्या मते, आरोपीने हत्येचा कट आधीच रचला होता आणि याच उद्देशाने तो नेपाळमार्गे कॅनडाहून पंजाबमध्ये पोहोचला आणि नंतर खून पुन्हा करून कॅनडाला पळून गेला.
पोलिसांवर देखील कुटुंबियांनी साधला निशाणा…
गायिकेच्या कुटुंबियांनी सांगितल्यानुसार, 15 मे रोजी सुखविंदर सिंग आणि त्याचा साथीदार करमजीत सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, तक्रार करूनही पोलिसांनी वेळेवर कोणतीही कारवाई केली नाही. जमालपूर पोलीस ठाण्याचे एसएचओ बलबीर सिंग यांनी सांगितल्यामनुसार, निलो कालव्यात मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ओळख पटवण्यासाठी कुटुंबाला बोलावले. पोलीस आता संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
