AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकप्रिय अभिनेत्याची बायकोला अत्यंत वाईट वागणूक; म्हणाला, ‘ती माझ्यासाठी फक्त एक बाई, जी माझ्या मुलांना जन्म देते आणि…’

'ती माझ्यासाठी फक्त एक बाई, जी माझ्या मुलांना जन्म देते आणि...', दुसऱ्या महिलांसोबत लोकप्रिय अभिनेत्याचे प्रेमसंबंध, बायकोला दिली अत्यंत वाईट वागणूक..., अनेक वर्षानंतर खुद्द अभिनेत्याने केले मोठा खुलासा...

लोकप्रिय अभिनेत्याची बायकोला अत्यंत वाईट वागणूक; म्हणाला, 'ती माझ्यासाठी फक्त एक बाई, जी माझ्या मुलांना जन्म देते आणि...'
Actor Piyush Mishra
| Updated on: Apr 05, 2026 | 8:28 AM
Share

कॅमेऱ्यासमोर सेलिब्रिटींचं आयुष्य फार चांगलं वाटतं, पण पडद्यामागचं सत्य काही वेगळंच आणि धक्का देणारं असतं. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेता आणि लेखकाच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अभिनेता नशेत अनेक महिलांना फोन करून अश्लील गोष्टी करायचा. शिवाय आईला देखील अभिनेत्याने अनेक वाईट शब्द बोललले आहेत. एवढंच नाही तर, बायकोला देखील अभिनेत्याने चांगली वागणूक दिलेली. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता म्हणाला, ‘ती माझ्यासाठी फक्त एक बाई आहे, जी माझ्या मुलांना जन्म देते आणि जेवण बनवते…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चे रंगली त्या अभिनेत्याचं नाव पियूष मिश्रा असून, त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलंय आणि संगित देखील दिलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत पियुष यांनी मान्य केलं की, विवाहित असताना, त्यांचे इतर महिलांसोबत प्रेमसंबंध होते… ते एक जबाबदार पती नव्हते शिवाय पत्नीच्या प्रेमाला देखील ते कधी समजू शकले नाहीत… आपलं लग्न झालं आहे आणि कुटुंब आहे, याची जाणीव लग्नाच्या 10 ते 15 वर्षांनंतर झाली.

पियूष मिश्रा म्हणाले, ‘मी आता एक चांगला पती झालेलो आहे. त्यावेळी मला माझ्या जबाबदारीची जाणीव नव्हती आणि लग्न म्हणजे मोठी जबाबदारी असते. 20 व्या वर्षी तुम्ही प्रेमात पडता… तेव्हा डोक्यात इतर कोणतेच विचार नसतात आणि प्रेम खूप चांगली गोष्ट आहे. पण 35 वर्षांनंतर तुम्ही त्याच व्यक्तीवर प्रेम करता, ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला वृद्ध व्हायला आवडेल. प्रेमाची खरी परिभाषा तिच महिला ठरवते, जिला तुमच्यासोबत वृद्ध व्हायतं आहे आणि पत्नीने ठरवलं आहे की, तिला माझ्यासोबत वृद्ध व्हायचं आहे.’

‘मला फार उशीरा कळलं की, माझं लग्न झालं आहे आणि मी नवरा आहे. ही गोष्ट समजण्यासाठी मला जवळपास 10 – 15 वर्ष लागतील. मी प्रिया हिला कधीच माझी पत्नी मानलं आहे. ती माझ्यासाठी फक्त एक बाई होती, जी माझ्या मुलांना जन्म देते, जेवण बनवते आणि घर सांभाळते… त्याशिवाय माझ्या मनात तिच्यासाठी कोणतीच भावना नव्हता… माझ्या मनात कोणत्याच भावना नव्हत्या… फक्त प्रियाच नाही, मला कोणाबद्दलच काही वाटत नव्हतं… ‘

पुढे पियूष म्हणाले, ‘प्रिया माझ्यावर प्रचंड प्रेम करत. माझ्यासोबत लग्न करण्यासाठी ती पळून आली. कुटुंबियांच्या विरोधात तिने माझ्यासोबत लग्न केलं… माझ्यासाठी तिने सर्व गोष्टींचा त्याग केला. ती कायम म्हणायच, तुम्ही काहीही करा मी घटस्फोट देणार नाही. तीने माझी साथ कधीच सोडली नाही… तिच्या प्रेमासाठी माझ्याकडे कोणतेच शब्द नाहीत… त्यामुळे मी स्वतः भाग्याशाली मानतो…’.

पत्नीला अफेअरबद्दल सांगितलं तेव्हा…

पियूष यांनी त्या दिवसाबद्दल सांगितलं, जेव्हा अभिनेत्याने पत्नीला अफेअरबद्दल सांगितलं होतं. ‘जेव्हा मला माझ्या चुका कळल्या, तेव्हा पत्नीच्या बाजूला बसलो आणि तिला सर्वकाही सांगितलं… त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांसोबत प्रचंड रडलो… त्यानंतर माझं मन हलकं झालं. प्रिया मला म्हणाली, माझ्याकडून देखील काही चुका झाल्या, पण तुम्ही जास्त चुका केल्या आहेत… आता हे प्रकरण याठिकाणी संपवून नवीन सुरुवात आपण करू शकतो… त्यानंतर आमचं नातं अधिक घट्ट झालं…’ असं देखील पियूष मिश्रा म्हणाले.

Follow Us
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 Cr...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी