AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टार प्रवाहवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अनेकांची निराशा

टीआरपीच्या शर्यतीत टॉप 5 मालिकांमध्ये स्थान मिळवलेली लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत. या मालिकांमधून विशाल निकम आणि शिवानी सुर्वे कमबॅक करत आहेत.

स्टार प्रवाहवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अनेकांची निराशा
Star Pravah serialsImage Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2024 | 10:36 AM
Share

छोट्या पडद्यावरील काही मालिका त्यांच्या दमदार कथानक आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडतात. त्यातही काही मालिका 500 आणि हजारो एपिसोड्सचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरतात. तर काही मालिकांना लवकरच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. गेल्या काही काळात छोट्या पडद्यावर बऱ्याच नव्या मालिकांनी जुन्या मालिकांची जागा घेतली आहे. आता अशीच एक लोकप्रिय मालिका लवकरच बंद होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका असून त्याजागी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे निरोप घेणारी ही मालिका अनेकदा टीआरपीच्या यादीत टॉप 5 मालिकांमध्ये असायची. तरीसुद्धा ती बंद करण्यात येणार असल्याने मालिकेच्या प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लवकरच दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. ‘येड लागलं प्रेमाचं’ आणि ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ अशी या दोन मालिकांची नावं आहेत. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून अभिनेता विशाल निकम पुनरागमन करतोय. त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिका साकारणार आहे. ही मालिका येत्या 27 मेपासून रात्री 10 वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही मालिका आता रात्री 10 ऐवजी 11 वाजता प्रसारित होणार आहे. सध्या 11 वाजता सुरू असलेली ‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

दुसरीकडे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे कमबॅक करतेय. ही मालिका येत्या 17 जूनपासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या 9 वाजता प्रसारित होणारी ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे. ही मालिका दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये सुरू झाली होती. यामध्ये उर्मिला कोठारे, अभिजीत खांडकेकर, प्रिया मराठे, अवनी तायवाडे यांनी भूमिका साकारल्या आहेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.