AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टार प्रवाहवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अनेकांची निराशा

टीआरपीच्या शर्यतीत टॉप 5 मालिकांमध्ये स्थान मिळवलेली लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत. या मालिकांमधून विशाल निकम आणि शिवानी सुर्वे कमबॅक करत आहेत.

स्टार प्रवाहवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अनेकांची निराशा
Star Pravah serialsImage Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2024 | 10:36 AM
Share

छोट्या पडद्यावरील काही मालिका त्यांच्या दमदार कथानक आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडतात. त्यातही काही मालिका 500 आणि हजारो एपिसोड्सचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरतात. तर काही मालिकांना लवकरच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. गेल्या काही काळात छोट्या पडद्यावर बऱ्याच नव्या मालिकांनी जुन्या मालिकांची जागा घेतली आहे. आता अशीच एक लोकप्रिय मालिका लवकरच बंद होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका असून त्याजागी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे निरोप घेणारी ही मालिका अनेकदा टीआरपीच्या यादीत टॉप 5 मालिकांमध्ये असायची. तरीसुद्धा ती बंद करण्यात येणार असल्याने मालिकेच्या प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लवकरच दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. ‘येड लागलं प्रेमाचं’ आणि ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ अशी या दोन मालिकांची नावं आहेत. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून अभिनेता विशाल निकम पुनरागमन करतोय. त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिका साकारणार आहे. ही मालिका येत्या 27 मेपासून रात्री 10 वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही मालिका आता रात्री 10 ऐवजी 11 वाजता प्रसारित होणार आहे. सध्या 11 वाजता सुरू असलेली ‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

दुसरीकडे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे कमबॅक करतेय. ही मालिका येत्या 17 जूनपासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या 9 वाजता प्रसारित होणारी ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे. ही मालिका दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये सुरू झाली होती. यामध्ये उर्मिला कोठारे, अभिजीत खांडकेकर, प्रिया मराठे, अवनी तायवाडे यांनी भूमिका साकारल्या आहेत.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.