AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरत जाधवनंतर प्रार्थना बेहरेनंही सोडली मुंबई; सांगितलं कारण

प्रार्थना ही तिचा पती अभिषेक जावकर आणि सासू-सासऱ्यांसोबत गेल्या काही महिन्यांपासून अलिबागमध्येच राहतेय. येत्या मे महिन्यात त्यांना अलिबागला शिफ्ट होऊन वर्ष पूर्ण होईल.

भरत जाधवनंतर प्रार्थना बेहरेनंही सोडली मुंबई; सांगितलं कारण
प्रार्थना बेहरेImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 16, 2024 | 3:12 PM
Share

अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं विविध मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. सोशल मीडियावर प्रार्थनाचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या ती कोणत्या मालिका किंवा चित्रपटात काम करत नसली तरी इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. प्रार्थनाने अनेकदा फोटो आणि व्हिडीओंमार्फत तिचं मुंबईतील जुहू इथल्या घराची झलक दाखवली आहे. जुहू याठिकाणी समुद्रकिनारी प्रार्थनाचं घर आहे. मात्र हे आलिशान घर सोडून प्रार्थना आणि तिचे कुटुंबीय दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलं.

सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या खास मुलाखतीत प्रार्थनाने मुंबई सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. “अभिच्या (अभिषेक) आजोबांची अलिबागमध्ये जागा आहे. कोरोना काळात आम्ही त्या जागेचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर जेव्हा रो-रो बोट सुरू झाली, तेव्हा मुंबई ते अलिबागचा प्रवाससुद्धा सोपा झाला आणि आमचा खूप वेळ वाचायचा. तिथे आम्ही घोडे, गायी, कुत्रे पाळले आहेत. त्या सगळ्यांच्या देखरेखीसाठी अभिला सतत अलिबागला ये-जा करायला लागायचं. अखेर आम्ही ठरवलं की आपण सगळेच तिथे राहायला जाऊयात”, असं ती म्हणाली.

मुंबईत आता पहिल्यासारखी मज्जा राहिली नाही, असंही प्रार्थना म्हणाली. “मालिका सुरू असताना आम्ही जुहूला राहायचो. पण सतत गर्दी, वाहतूक कोंडी यांमुळे मुंबईचा वैताग येऊ लागला. स्वत:साठी काहीच वेळ देता येत नव्हतं. अलिबागमध्ये थोडं निवांत राहता येईल असं वाटलं. इथे मला माझी पेंटिंगचीही आवड जपता येते. मी सगळीकडे बिनधास्त मेकअपशिवाय फिरते. निसर्गाच्या सानिध्यात बराच वेळ घालवते. या सगळ्याच माझ्या आवडत्या गोष्टी आहेत. म्हणूनच आम्ही अलिबागला कायमस्वरुपी राहायला यायचं असं ठरवलं. माझ्या सासू-सासऱ्यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला. इथल्या वातावरणात त्यांचं आयुष्य आणखी वाढलंय असं मला वाटतं. प्रवासाच्या दृष्टीने आम्हाला थोडा त्रास होईल, पण आता त्याचीही सवय झाली आहे”, असं तिने सांगितलं.

Follow Us
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत....
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत.....
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण.
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन.
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प.
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं...
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं....