कोण ठरेल ‘Khatron Ke Khiladi 11’चा विजेता? राखी सावंतने घेतले ‘या’ स्पर्धकाचे नाव!

खतरों के खिलाडी सीजन 11 (Khatron Ke Khiladi 11) या रिअॅलिटी शोची तयारी सध्या सुरू झाली आहे. ‘बिग बॉस 14’चे अनेक स्पर्धक यात सहभागी झाले आहेत.

कोण ठरेल ‘Khatron Ke Khiladi 11’चा विजेता? राखी सावंतने घेतले ‘या’ स्पर्धकाचे नाव!
राखी सावंत
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 1:25 PM

मुंबई : खतरों के खिलाडी सीजन 11 (Khatron Ke Khiladi 11) या रिअॅलिटी शोची तयारी सध्या सुरू झाली आहे. ‘बिग बॉस 14’चे अनेक स्पर्धक यात सहभागी झाले आहेत. दरम्यान, जेव्हा ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) हिला विचारले गेले की, तिच्यानुसार हा शो कोण जिंकू शकेल?  हे विचारताच त्यांनी रुबीना दिलैक हिचा पती-अभिनेता अभिनव शुक्ला (Abhinav Shulka) याचे नाव घेतले (Rakhi Sawant Says Abhinav Shukla will win Khatron Ke Khiladi 11).

अभिनव शुक्ला जिंकू शकतो हा शो!

‘बिग बॉस सीझन 14’मध्ये अभिनव शुक्लाची कामगिरी खूप चमकदार होती. त्याने या शोमध्ये केवळ अनेक कठीण टास्क करून दाखवले नाहीत तर, शोमध्येही तो बराच काळ टिकून राहिला. राखीने आपल्या स्टाईलमध्ये म्हटले की, अभिनव शुक्ला खूप स्ट्राँग आहे आणि तो जिंकू शकतो, असे तिला वाटते. तसेच राखीने असेही म्हटले आहे की, अभिनव कोणालाही घाबरत नाही आणि त्याला गिर्यारोहण करण्याचा खूप अनुभव आहे, ज्यामुळे तो हा शो जिंकू शकतो.

दिव्यांका, विशालबद्दल राखी म्हणते…

राखीने हेही सांगितले की, अभिनव शुक्लाचे स्वप्न आहे की, एके दिवशी तो एव्हरेस्टवर सर करेल. राखी सावंत म्हणाली की, या शोमध्ये दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) तिची आवडती स्पर्धक आहे. इतर स्पर्धकांबद्दल विचारले असता राखी म्हणाते की, तिला अर्जुन बिजलानी आणि विशाल आदित्य सिंग देखील आवडतात. पण, तरीही अभिनवमध्ये जिंकण्याची क्षमता आहे (Rakhi Sawant Says Abhinav Shukla will win Khatron Ke Khiladi 11.

राहुल वैद्य का गेला माहित नाही?

राखीने श्वेता तिवारीचे कौतुक करताना म्हटले की, सर्व अडचणी असूनही ती एक मजबूत स्पर्धक आहे. त्यानंतर राखी बिग बॉसची तिची प्रतिस्पर्धी निक्की तंबोलीबद्दल बोलताना म्हणाली, ‘निक्कीसुद्धा खूप तगडी स्पर्धक आहे, पण कधीकधी ती टास्क करताना घाबरत असते.’ यावेळी राखीने निक्कीच्या भावाच्या अचानक निधनाबद्दल शोक व्यक्त केला. राहुल वैद्यने या कार्यक्रमात भाग घेतला असल्याचे कळताच राखी आश्चर्यचकित झाली. ती म्हणाले, ‘राहुल वैद्य या शोमध्ये का गेला, मला माहिती नाही. त्याला पाठीच्या खूप समस्या आहेत. मी राहुल वैद्य याच्यासाठी प्रार्थना करीन, की तो नेहमी सुखरूप राहावा.’

(Rakhi Sawant Says Abhinav Shukla will win Khatron Ke Khiladi 11)

हेही वाचा :

Kangana Ranaut | कंगना रनौतला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

पाकिस्तान सरकारची कारवाई, दिलीपकुमार-राज कपूर यांच्या हवेली मालकांना अखेरची नोटीस!

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.