AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“स्वत: संन्यासी बनून बिझनेस केला अन्..”; ममता कुलकर्णीवर टीका करणाऱ्या बाबा रामदेव यांना राखी सावंतचं उत्तर

ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वर बनण्यावरून बाबा रामदेव यांनी टीका केली होती. आता राखी सावंतने त्यांना उत्तर दिलं आहे. तुम्ही भगवे वस्त्र परिधान करून बिझनेस केला, अशी टीका तिने बाबा रामदेव यांच्यावर केली आहे. राखी काय म्हणाली, ते सविस्तर वाचा..

स्वत: संन्यासी बनून बिझनेस केला अन्..; ममता कुलकर्णीवर टीका करणाऱ्या बाबा रामदेव यांना राखी सावंतचं उत्तर
Rakhi Sawant, Mamta Kulkarni and Baba RamdevImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 31, 2025 | 1:46 PM
Share

योगगुरू बाबा रामदेव यांनी अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या संन्यास घेण्यावरून टीका केली. एका दिवसात कोणी साधूसंत बनत नाही, असं ते म्हणाले. त्यावरून आता अभिनेत्री राखी सावंतने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही संन्यासी बनून बिझनेस केलात आणि आता ममता कुलकर्णीचं संन्यास घेणं तुम्हाला आक्षेपार्ह वाटतंय, अशा शब्दांत तिने टीका केली. ममताने महाकुंभमध्ये संन्यास घेतला असून किन्नर अखाड्याची ती महामंडलेश्वर बनली. मात्र यावरून काही साधू-संतांनी आक्षेप नोंदवला होता. “महाकुंभ हे सनातन धर्मातील एक भव्य उत्सव आहे. हे एक पवित्र पर्व आहे. काही लोक कुंभच्या नावाआड अश्लीलता, नशा आणि गैरव्यवहार करत आहेत. तर काही लोक, जे कालपर्यंत सांसारिक सुखांमध्ये मग्न होते, अचानक एका दिवसात ते संत बनले आहेत. त्यांना महामंडलेश्वरची उपाधी दिली जात आहे”, असा टोला बाबा रामदेव यांनी लगावला होता.

काय म्हणाली राखी सावंत?

“बाबा रामदेव यांनी अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वर बनण्यावरून आक्षेप घेतला आहे. ममताने नव्वदच्या दशकात मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम केलंय. आता तिच्या संन्यास घेण्यावरून बाबा रामदेव यांनी अभद्र शब्द वापरले आहेत. जी मुलगी बॉलिवूडमधून आली, ग्लॅमर वर्ल्डमध्ये राहिली, ती संन्यासी बनू शकत नाही, असं ते म्हणाले. मी त्यांना बोलू इच्छिते की, बाबा रामदेवजी.. तुम्ही तर संन्यासी असून बिझनेस केला. मार्केटमध्ये तुम्ही तेल, बिस्किटपासून अशा अशा गोष्टी विकल्या आहेत, हे लज्जास्पद आहे. भगवे कपडे घातल्याने कोणी साधू बनत नाही. तुम्ही लोकांना चुना लावला आहे. त्यामुळे ममता कुलकर्णीबद्दल तुम्ही काही न बोललेलंच बरं आहे”, असं राखी म्हणाली.

“ममता कुलकर्णीची बाजू कोणी नाही घेतली तरी मी तिच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. 25 वर्षांनंतर ती भारतात आली आणि कुंभमेळ्यात रडत-रडत तिने संन्यास घेतला. तिचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे. पण तुम्हाला तिच्याबद्दल ईर्षा वाटू लागली आहे. एक मुलगी या संसाराचा, तोकड्या कपड्यांचा, अश्लीलतेला त्याग करून संन्यास घेतेय, याचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे”, असा सल्ला राखीने बाबा रामदेव यांना दिला.

“ममता कुलकर्णी.. तू अशा लोकांचं बोलणं मनावर घेऊ नकोस, त्यांना सडेतोड उत्तर दे. तू काहीच चुकीचं केलं नाहीस. बाबा रामदेवजींचा मी खूप आदर करते. पण तुम्ही ममता कुलकर्णीबद्दल जे वक्तव्य केलं, ते चुकीचं आहे. तुम्ही तिचं कौतुक करायला हवं. तुम्ही संन्यासी बनून बिझनेसमन बनले. भगवे वस्त्र परिधान करून तुम्ही बिझनेस केला आहे, तुम्ही लोकांना लुटत आहात”, अशी थेट टीका तिने केली आहे.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.