AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रामायण’मधील विभीषणाचा कसा झालेला दुर्दैवी मृत्यू, कुटुंबीयांना कधी पटली मृतदेहाची ओळख?

रामायण'मधील विभीषणाचा झालेला हृदयद्रावक अंत... 1 दिवस कुठे आणि कशा अवस्थेत होता मृतदेह... मृत्यूचं कारण कळताच म्हणाल, असं कोणासोबतच नको व्हायला..., मृत्यूनंतर देखील अभिनेता कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत...

'रामायण'मधील विभीषणाचा कसा झालेला दुर्दैवी मृत्यू,  कुटुंबीयांना कधी पटली मृतदेहाची ओळख?
| Updated on: Apr 13, 2026 | 9:18 AM
Share

मृत्यू कोणाला चुकलेला नाही आणि कधी, कुठे आणि कसा कोणाचा मृत्यू होईल काहीही सांगता येत नाही. असं म्हणतात माणसाचा काळ आणि वेळ एकत्र आला की, त्याचा अंत निश्चित आहे. मृत्यूला कोणीच थांबवू शकत नाही. पण मृत्यूनंतर देखील व्यक्ती त्याच्या कामातून जिवंत असतो. असं काही ‘रामायण’ मालिकेतील एका अभिनेत्यासोबत झालं. अभिनेत्याचा अंत अत्यंत हृदयद्रावक होता. 1 दिवस अभिनेत्याचा मृत्यू कशा अवस्थेत होता कोणालाच माहिती नव्हतं… अशात अभिनेत्याच्या निधनाबद्दल जाणून कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला…

‘रामायण’ मालिकेला अनेक वर्ष झाली आहेत. पण मालिकेतील कलाकार आणि काही घटना आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मालिकेत विभीषणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला रेल्वे रुळावर दुर्दैवी मृत्यू झालेला. अभिनेत्याच्या निधनाचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेले. ‘रामायण’ मालिकेत विभीषणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव मुकेश रावल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 66 वर्षीय मुकेश रावल यांचं निधन रेल्वे रुळाची पटरी पार करताना झालं. रेल्वे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी पीटीआयला सांगितलं होतं की, त्यांचा मृतदेह सकाळी 9.33 वाजता सापडला होता, परंतु अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी त्याची ओळख पटवली. कौशिक यांनी सांगितलं की, बोरिवली आणि कांदिवली रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर मृतदेह सापडला होता.

मुकेश रावल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते प्रसिद्ध थिएटर कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं. पण रामानंद सागर यांनी मुकेश यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं… असं म्हटलं जातं की, रामानंद यांनी मुकेश यांना नाटकाच्या प्रयोगादरम्यान पाहिलं आणि तेव्हाच त्यांनी विभीषण बनवण्याचा निर्णय घेतला.

मुकेश रावल यांना मेघनादची भूमिका साकारायची होती. म्हणून, रामानंद सागर यांनी त्यांची विभीषण तसेच मेघनादच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेतली. त्यांना विभीषणाच्या भूमिकेसाठी दिलेली त्यांची ऑडिशन अधिक आवडली आणि त्यांची निवड झाली. असं देखील सांगितलं जातं…

‘रामायण’ मालिकेतील कास्ट

रामायण मालिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया, अभिनेते अरुण गोविल आणि सुनील लहरी यांनी ‘देवी सीता’, ‘प्रभू राम आणि प्रभू लक्ष्मण’ यांची भूमिका साकारली होती. आज देखील त्यांना अनेक ठिकाणा सन्मानित केलं जातं… आजही त्यांचं अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल