AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rani Mukerji हिच्यावर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे आरोप; अभिनेत्रीच्या प्रेमात ‘या’ अभिनेत्याने ओलांडली मर्यादा

आज आनंदाने वैवाहिक आयुष्य जगत असलेल्या अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्यावर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे आरोप... एक दोन नाही तर इतक्या अभिनेत्यांसोबत राणीचे प्रेमसंबंध

Rani Mukerji हिच्यावर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे आरोप; अभिनेत्रीच्या प्रेमात 'या' अभिनेत्याने ओलांडली मर्यादा
| Updated on: Mar 14, 2023 | 2:41 PM
Share

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी हिने बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष राज्य केलं. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये फक्त आणि फक्त राणीच्या नावाची चर्चा असायची. एवढंच नाही तर, राणीसोबत काम करण्यासाठी अनेक दिग्दर्शक, निर्माते अभिनेते रांगेत असायचे. राणीने महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून अनेक नव्या अभिनेत्यांसोबत देखील काम केलं आहे. राणी कायम तिच्या अभिनेयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहिली. पण राणीच्या नावाची तुफान चर्चा रंगली जेव्हा राणीने २०१४ साली गुपचूप लग्न केलं. पण लग्नाआधी देखील राखीचं अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आलं.

ज्या अभिनेत्यांचं नाव राणीसोबत जोडण्याच आलं त्यामधील काही अभिनेते विवाहित होते. ज्यामुळे राणी हिच्यावर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे आरोप करण्यात आले. आज राणीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेवू. ज्यामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली.

अभिनेता गोविंदा : राणी मुखर्जी आणि गोविंदा यांची ओळख २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘हद कर दी आपने’ सिनेमाच्या सेटवर झाली. राणी आणि गोविंदा यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. तेव्हाच त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. पण गोविंदा तेव्हा विवाहित होता. दोघांच्या अफेअरची गोष्ट अभिनेत्याच्या घरी कळाल्यानंतर गोविंदाची पत्नी सुनीता यांना मोठा धक्का बसला. पण अखेर गोविंदाने प्रेम विसरून कुटुंबाला सर्वात जास्त महत्त्व दिलं. राणीच्या आईला देखील गोविंदासोबत लेकीचं असलेलं नातं मान्य नव्हतं.

अभिनेता आमिर खान : राणी आणि आमिर यांची पहिली भेट 1998 साली प्रदर्शित झालेल्या ‘विक्रम भट्ट’ सिनेमा दरम्यान झाली. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. रिल लाईफ प्रमाणे त्यांची रियल लाईफमधील केमिस्ट्री देखील चाहत्यांना आवडू लागली. जेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागली, तेव्हा आमिर आणि पहिली पत्नी रीना यांच्यातील वाद देखील समोर आले. एवढंच नाहीतर, आमिर माझा क्रश असल्याचा राणीने कार्यक्रमात स्वीकार केला.

अभिनेता अभिषेक बच्चन : अभिषेक बच्चन आणि राणी यांच्या नावाच्या देखील तुफान चर्चा रंगल्या. दोघांचा साखरपुडा झाल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला. दोघांच्या नात्याला अभिनेत्री जया बच्चन यांचा देखील होकार होता. पण अभिषेक याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केला. आज अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.

आदित्य चोप्रा : आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांच्या अफेअरच्या चर्चांनी देखील जोर धरला. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्यने लहानपणीची मैत्रिण पायलसोबत लग्न देखील केलं होतं. पण आदित्यच्या आयुष्यात राखीची एन्ट्री झाली आणि आदित्यचे पत्नीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर काही वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता राणी आदित्यसोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.

पहिली पत्नी पायल हिला घटस्फोट दिल्यानंतर आदित्यने अनेक वर्ष अभिनेत्री राणी मुखर्जीला डेट केलं. त्यानंतर २१ एप्रिल २०१४ मध्ये दोघांनी गुपचूप लग्न केलं. आदित्य आणि राणी यांना एक मुलगी देखील आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.