AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rani Mukerji हिच्यावर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे आरोप; अभिनेत्रीच्या प्रेमात ‘या’ अभिनेत्याने ओलांडली मर्यादा

आज आनंदाने वैवाहिक आयुष्य जगत असलेल्या अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्यावर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे आरोप... एक दोन नाही तर इतक्या अभिनेत्यांसोबत राणीचे प्रेमसंबंध

Rani Mukerji हिच्यावर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे आरोप; अभिनेत्रीच्या प्रेमात 'या' अभिनेत्याने ओलांडली मर्यादा
| Updated on: Mar 14, 2023 | 2:41 PM
Share

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी हिने बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष राज्य केलं. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये फक्त आणि फक्त राणीच्या नावाची चर्चा असायची. एवढंच नाही तर, राणीसोबत काम करण्यासाठी अनेक दिग्दर्शक, निर्माते अभिनेते रांगेत असायचे. राणीने महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून अनेक नव्या अभिनेत्यांसोबत देखील काम केलं आहे. राणी कायम तिच्या अभिनेयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहिली. पण राणीच्या नावाची तुफान चर्चा रंगली जेव्हा राणीने २०१४ साली गुपचूप लग्न केलं. पण लग्नाआधी देखील राखीचं अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आलं.

ज्या अभिनेत्यांचं नाव राणीसोबत जोडण्याच आलं त्यामधील काही अभिनेते विवाहित होते. ज्यामुळे राणी हिच्यावर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे आरोप करण्यात आले. आज राणीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेवू. ज्यामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली.

अभिनेता गोविंदा : राणी मुखर्जी आणि गोविंदा यांची ओळख २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘हद कर दी आपने’ सिनेमाच्या सेटवर झाली. राणी आणि गोविंदा यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. तेव्हाच त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. पण गोविंदा तेव्हा विवाहित होता. दोघांच्या अफेअरची गोष्ट अभिनेत्याच्या घरी कळाल्यानंतर गोविंदाची पत्नी सुनीता यांना मोठा धक्का बसला. पण अखेर गोविंदाने प्रेम विसरून कुटुंबाला सर्वात जास्त महत्त्व दिलं. राणीच्या आईला देखील गोविंदासोबत लेकीचं असलेलं नातं मान्य नव्हतं.

अभिनेता आमिर खान : राणी आणि आमिर यांची पहिली भेट 1998 साली प्रदर्शित झालेल्या ‘विक्रम भट्ट’ सिनेमा दरम्यान झाली. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. रिल लाईफ प्रमाणे त्यांची रियल लाईफमधील केमिस्ट्री देखील चाहत्यांना आवडू लागली. जेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागली, तेव्हा आमिर आणि पहिली पत्नी रीना यांच्यातील वाद देखील समोर आले. एवढंच नाहीतर, आमिर माझा क्रश असल्याचा राणीने कार्यक्रमात स्वीकार केला.

अभिनेता अभिषेक बच्चन : अभिषेक बच्चन आणि राणी यांच्या नावाच्या देखील तुफान चर्चा रंगल्या. दोघांचा साखरपुडा झाल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला. दोघांच्या नात्याला अभिनेत्री जया बच्चन यांचा देखील होकार होता. पण अभिषेक याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केला. आज अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.

आदित्य चोप्रा : आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांच्या अफेअरच्या चर्चांनी देखील जोर धरला. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्यने लहानपणीची मैत्रिण पायलसोबत लग्न देखील केलं होतं. पण आदित्यच्या आयुष्यात राखीची एन्ट्री झाली आणि आदित्यचे पत्नीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर काही वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता राणी आदित्यसोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.

पहिली पत्नी पायल हिला घटस्फोट दिल्यानंतर आदित्यने अनेक वर्ष अभिनेत्री राणी मुखर्जीला डेट केलं. त्यानंतर २१ एप्रिल २०१४ मध्ये दोघांनी गुपचूप लग्न केलं. आदित्य आणि राणी यांना एक मुलगी देखील आहे.

Follow Us
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....