AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या सीनला घाबरून माधुरी रडली होती, सेटवर नेमकं काय घडलं होतं; व्हिलन रंजीत यांनी सांगितला किस्सा

बाॅलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. माधुरी दीक्षित हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. माधुरी दीक्षित ही सोशल मीडियावर सक्रिय असून माधुरीने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटे बाॅलिवूडला दिली आहेत.

त्या सीनला घाबरून माधुरी रडली होती, सेटवर नेमकं काय घडलं होतं; व्हिलन रंजीत यांनी सांगितला किस्सा
madhuri dixit
| Updated on: Apr 06, 2024 | 1:09 PM
Share

बाॅलिवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षितने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. माधुरी दीक्षितची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. माधुरी दीक्षित आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच माधुरी दिसते. नुकताच माधुरी दीक्षित हिच्याबद्दल व्हिलन रंजीत यांनी एक अत्यंत मोठा किस्सा सांगितला. अभिनेते रंजीत यांनी 500 चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.

500 पैकी जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये रंजीत यांनी खलनायकाची भूमिका करताना दिसले. नुकताच रंजीत यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना रंजीत हे दिसले. रंजीत म्हणाले की, प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटात मला माधुरी दीक्षितसोबत सीन शूट करायचा होता. मात्र, तो सीन शूट करण्याच्या अगोदर माधुरी रडायला लागली.

हेच नाही तर तिने माझ्यासोबत काम करण्यास नकारही दिला. मुळात म्हणजे मला काय घडत आहे हेच माहिती नव्हते. चित्रपटाच्या सेटवर माधुरी येत नव्हती. या चित्रपटात माधुरी एका गरीब व्यक्तीची मुलगी होती. या चित्रपटात मला माधुरीसोबत छेडछाड करायची होती. मी विचार करत होतो की, माधुरी अजून का नाही आली.

मला माहितीच नव्हते की, काय घडत आहे. त्यानंतर शेवटी माधुरीने ऐकले आणि ती सेटवर पोहचली. त्यावेळी मला फाइट मास्टर वीरू देवगनने सांगितले की, एकाच टेकमध्ये संपूर्ण सीन शूट करायचा आहे. खलनायक खऱ्या आयुष्यात खराब नसतात हे देखील माधुरी दीक्षितला समजवण्यात आले. त्यावेळी तिने या सीनसाठी होकार दिला.

प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत मिथून चक्रवर्ती मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट 1989 मध्ये रिलीज झाला. आता रंजीत यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. रंजीत यांची खलनायक म्हणून ओळख आहे. रंजीत यांनी खूप मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. रंजीत यांची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Follow Us
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या...
Manoj Jarange | भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या निमंत्रणाला मनोज जरांगेंचा नकार; पुढे म्हणाले...
मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?
Rohit Pawar on Parth Pawar | मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाच्या सवालानंतर रोहित पवारांचा मोठा सल्ला, म्हणाले...
15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
Rohit Pawar | 15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ
Nagpur Orange Loss | संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ; 20-25 दिवसांपासून पाऊस गायब, शेतकरी संकटात