AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढेंची चित्रपटसृष्टीत एन्ट्री, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाची मागणी, धाबे दणाणार; आता थेट शुटिंगच्यावेळीच…

चित्रपट आणि मालिकांच्या सेटवरील अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; तुकाराम मुंढे यांच्याकडे कठोर कारवाईची राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाची मागणी.

तुकाराम मुंढेंची चित्रपटसृष्टीत एन्ट्री, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाची मागणी, धाबे दणाणार; आता थेट शुटिंगच्यावेळीच...
| Updated on: Jul 09, 2026 | 3:37 PM
Share

महाराष्ट्रातील मराठी, हिंदी तसेच इतर भाषांतील मालिका, चित्रपट आणि वेब मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या निकृष्ट दर्जाबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून, या प्रकरणाची राज्यस्तरीय चौकशी करून अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर मालिका, चित्रपट आणि वेब मालिकांचे चित्रीकरण सुरू असते. या चित्रीकरणामध्ये हजारो कलाकार, तंत्रज्ञ, सहाय्यक कर्मचारी आणि इतर कर्मचारी सलग 12 ते 16 तास किंवा त्याहून अधिक काळ काम करतात. अशा परिस्थितीत त्यांना दर्जेदार, स्वच्छ, पौष्टिक आणि सुरक्षित अन्न मिळणे अत्यावश्यक असून, ती संबंधित निर्मिती संस्था आणि केटरिंग सेवा पुरवठादारांची कायदेशीर तसेच नैतिक जबाबदारी असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.

मात्र, अनेक चित्रीकरण स्थळांवर कलाकार व तंत्रज्ञांना निकृष्ट दर्जाचे, अस्वच्छ आणि आरोग्यास अपायकारक अन्न पुरविले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही ठिकाणी अन्नसुरक्षा व मानके अधिनियम (FSSAI) अंतर्गत निर्धारित नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही निदर्शनास येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांना निवेदन

यापार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभरातील सर्व चित्रपट, मालिका आणि वेब मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर अचानक तपासणी मोहीम राबवावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच कलाकार व तंत्रज्ञांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासावी आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित केटरिंग कंत्राटदार, निर्मिती संस्था तसेच जबाबदार व्यक्तींवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, सर्व चित्रीकरण स्थळांसाठी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, साठवण व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वयंपाकगृहाची स्वच्छता तसेच अन्न वितरण प्रक्रियेबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. अन्नसुरक्षा नियमांचे नियमित पालन होत आहे की नाही, यासाठी वेळोवेळी विशेष तपासणी व निरीक्षण मोहिमा राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, कलाकार आणि तंत्रज्ञ हे मनोरंजन उद्योगाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन राज्यभर प्रभावी तपासणी मोहीम राबवावी आणि दोषींवर कठोर कारवाई करून चित्रीकरण स्थळांवर सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपुरवठा सुनिश्चित करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Follow Us
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 Cr...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी