AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहित रवी किशन यांचं नगमासोबत होतं अफेअर? बऱ्याच वर्षांनंतर अखेर सोडलं मौन

2009 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नगमाने अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. "मला एक गोष्ट समजत नाही की तुमच्या सहकलाकारासोबत चांगली मैत्री झाली तर काय बिघडलं? आम्ही एकमेकांसोबत कम्फर्टेबल असलो तर त्यात काय चुकीचं आहे?" असा सवाल केला होता.

विवाहित रवी किशन यांचं नगमासोबत होतं अफेअर? बऱ्याच वर्षांनंतर अखेर सोडलं मौन
Ravi Kishan and NagmaImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 02, 2023 | 10:48 AM
Share

नवी दिल्ली : नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नगमाने हिंदीसोबतच भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केलंय. ‘पंडित जी बताई ना बियाह कब होई’ या चित्रपटातून तिने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये तिने अभिनेते रवी किशन यांच्यासोबत भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर दोघांनी बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केलं होतं. त्याचदरम्यान या दोघांच्या अफेअरच्या चर्चा इंडस्ट्रीत होऊ लागल्या होत्या. त्यावेळी रवी किशन विवाहित होते. आता बऱ्याच वर्षांनंतर रवी किशन यांनी या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

रवी किशन हे नुकतेच ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात पोहोचले होते. या मुलाखतीत त्यांना नगमा यांच्यासोबतच्या अफेअरविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रवी किशन म्हणाले, “आम्ही यासाठी एकत्र बरेच चित्रपट केले, कारण आमचे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरत होते. आमच्यात चांगली मैत्रीसुद्धा होती. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला हे माहित होतं की मी विवाहित होतो. मी माझी पत्नी प्रिती शुक्लाचा खूप आदर करतो आणि प्रसंगी मला तिची भीतीही वाटते. मी हे आधीसुद्धा सांगितलंय की मी तिच्या पायाही पडतो. माझ्याकडे जेव्हा पैसा नव्हता, तेव्हापासून ती माझ्यासोबत आहे. तिने माझी साथ कधीच सोडली नाही.”

View this post on Instagram

A post shared by Ravi Kishan (@ravikishann)

यावेळी रवी किशन ‘बिग बॉस’ या शोविषयीही व्यक्त झाले. “माझे चित्रपट हिट होऊ लागल्यानंतर मी जरा अहंकारी झालो होतो. त्यावेळी बिग बॉसमध्ये भाग घेण्याचा सल्ला माझ्या पत्नीने दिला होता. सुरुवातीला मी संभ्रमात होतो, पण अखेर तिचं ऐकून मी भाग घेतला. बिग बॉसच्या घरात जवळपास तीन महिने राहिल्यानंतर माझ्यात बराच बदल झाला. मी केवळ अधिक प्रसिद्ध झालो नाही, तर माझ्या स्वभावात बराच नम्रपणा आला”, असं ते पुढे म्हणाले.

2009 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नगमाने अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. “मला एक गोष्ट समजत नाही की तुमच्या सहकलाकारासोबत चांगली मैत्री झाली तर काय बिघडलं? आम्ही एकमेकांसोबत कम्फर्टेबल असलो तर त्यात काय चुकीचं आहे? पडद्यावर आम्ही पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे कॅमेऱ्याच्या मागेही तुम्हाला कम्फर्ट लेव्हलची गरज असते”, असं ती म्हणाली होती.

Follow Us
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी.
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी....
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....