विवाहित रवी किशन यांचं नगमासोबत होतं अफेअर? बऱ्याच वर्षांनंतर अखेर सोडलं मौन

2009 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नगमाने अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. "मला एक गोष्ट समजत नाही की तुमच्या सहकलाकारासोबत चांगली मैत्री झाली तर काय बिघडलं? आम्ही एकमेकांसोबत कम्फर्टेबल असलो तर त्यात काय चुकीचं आहे?" असा सवाल केला होता.

विवाहित रवी किशन यांचं नगमासोबत होतं अफेअर? बऱ्याच वर्षांनंतर अखेर सोडलं मौन
Ravi Kishan and NagmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 10:48 AM

नवी दिल्ली : नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नगमाने हिंदीसोबतच भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केलंय. ‘पंडित जी बताई ना बियाह कब होई’ या चित्रपटातून तिने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये तिने अभिनेते रवी किशन यांच्यासोबत भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर दोघांनी बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केलं होतं. त्याचदरम्यान या दोघांच्या अफेअरच्या चर्चा इंडस्ट्रीत होऊ लागल्या होत्या. त्यावेळी रवी किशन विवाहित होते. आता बऱ्याच वर्षांनंतर रवी किशन यांनी या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

रवी किशन हे नुकतेच ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात पोहोचले होते. या मुलाखतीत त्यांना नगमा यांच्यासोबतच्या अफेअरविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रवी किशन म्हणाले, “आम्ही यासाठी एकत्र बरेच चित्रपट केले, कारण आमचे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरत होते. आमच्यात चांगली मैत्रीसुद्धा होती. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला हे माहित होतं की मी विवाहित होतो. मी माझी पत्नी प्रिती शुक्लाचा खूप आदर करतो आणि प्रसंगी मला तिची भीतीही वाटते. मी हे आधीसुद्धा सांगितलंय की मी तिच्या पायाही पडतो. माझ्याकडे जेव्हा पैसा नव्हता, तेव्हापासून ती माझ्यासोबत आहे. तिने माझी साथ कधीच सोडली नाही.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Ravi Kishan (@ravikishann)

यावेळी रवी किशन ‘बिग बॉस’ या शोविषयीही व्यक्त झाले. “माझे चित्रपट हिट होऊ लागल्यानंतर मी जरा अहंकारी झालो होतो. त्यावेळी बिग बॉसमध्ये भाग घेण्याचा सल्ला माझ्या पत्नीने दिला होता. सुरुवातीला मी संभ्रमात होतो, पण अखेर तिचं ऐकून मी भाग घेतला. बिग बॉसच्या घरात जवळपास तीन महिने राहिल्यानंतर माझ्यात बराच बदल झाला. मी केवळ अधिक प्रसिद्ध झालो नाही, तर माझ्या स्वभावात बराच नम्रपणा आला”, असं ते पुढे म्हणाले.

2009 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नगमाने अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. “मला एक गोष्ट समजत नाही की तुमच्या सहकलाकारासोबत चांगली मैत्री झाली तर काय बिघडलं? आम्ही एकमेकांसोबत कम्फर्टेबल असलो तर त्यात काय चुकीचं आहे? पडद्यावर आम्ही पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे कॅमेऱ्याच्या मागेही तुम्हाला कम्फर्ट लेव्हलची गरज असते”, असं ती म्हणाली होती.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.