AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेखा यांना या गोष्टीची वाटते फारच भीती; अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला, ‘सेटवरही त्या फार…

एका अभिनेत्याने रेखासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला तसेच. रेखा यांना आयुष्यात सर्वात जास्त कशाची भीती वाटते हे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे सेटवर रेखा त्या अभिनेत्याशी फार बोलत नसतं असही तो म्हणाला.

रेखा यांना या गोष्टीची वाटते फारच भीती; अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला, 'सेटवरही त्या फार...
rekha and kabir bediImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 16, 2025 | 8:06 PM
Share

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा या कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. पण जास्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातीस बरेच प्रसंग, किस्से आजही चर्चेचा विषय ठरतात. असाच एक प्रसंग एका अभिनेत्यानेही सांगितला आहे. रेखासोबत काम करतानाचा त्याचा अनुभवही सांगितला आहे. तसेच रेखा त्यांच्या आयुष्यात ज्या एका गोष्टीला घाबरतात त्याबद्दलही या अभिनेत्याने सांगितलं आहे.

हा अभिनेता म्हणजे कबीर बेदी. कबीर बेदी यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्यांनी 1988 मध्ये आलेल्या खून भारी मांग या चित्रपटात रेखासोबत काम केले होते. या चित्रपटात त्यांनी नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. आता कबीर यांनी रेखासोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव सांगितला.

चित्रपटात नायक देखील खलनायक आहे

एका मुलाखतीत कबीर म्हणाले, ‘मला खून भरी मांग हा चित्रपट सर्वात जास्त आठवतो. तो चित्रपट सुपरहिट झाला होता. मी दुसऱ्या एका मालिकेत काम करत होतो. त्या काळात मला राकेश रोशनचा फोन आला. त्यांनी मला चित्रपटाच्या नायकाची भूमिका ऑफर केली आणि मी त्यांना विचारले की तुम्ही मला का निवडले. यानंतर त्यांनी मला सांगितले की या चित्रपटात नायक देखील खलनायक आहे आणि इतर कोणताही नायक ही भूमिका करू इच्छित नाही. त्यांनी सांगितले की फक्त मीच नायक आणि खलनायकाची भूमिका करू शकतो.’

रेखासोबत काम करून आनंद झाला

कबीर पुढे म्हणाले की, “रेखासोबत काम करायला मिळणे मला भाग्यवान वाटते. राकेशने मला रेखा या चित्रपटात नायिका असल्याचे सांगताच मी होकार दिला. त्यावेळी तिच्यासोबत काम करणे अभिमानाची गोष्ट होती. उमराव जानसाठी तिने अनेक पुरस्कार जिंकले होते आणि ती एक उत्तम अभिनेत्री होती, म्हणून मी माझे दुसरे शूट पुन्हा शेड्यूल केले. रेखाने तो चित्रपट आजचा आहे तसा बनवला, ती खून भरी मांग चित्रपटाची हृदय आणि आत्मा होती. या चित्रपटाने लोकांची मने जिंकली आणि मला ही मोठी संधी सोडायची नव्हती.’

रेखासोबत फक्त चित्रपटांपुरताचं बोलणं व्हायचं

तथापि, कबीर यांनी असेही सांगितले की ते रेखासोबत फारसे मोकळेपणाने बोलू शकत नव्हते कारण रेखा खूप संवेदनशील आहे आणि त्यांना दुखावले जाऊ अशी सतत भीती वाटत राहायची.

रेखा यांना याच गोष्टीची भीती जाणवते 

कबीर यांनी म्हटलं की, “आम्ही दोघेही एकमेकांचा आदर करतो. ती खूप खाजगी व्यक्ती आहे. ती खूप संवेदनशील मुलगी होती जिला दुखावले जाण्याची सतत भीती वाटत होती, म्हणून ती स्वतःचे रक्षण करायची आणि तिच्या या भावनेचा मी आदर करायचो. आजही आम्ही चांगले भेटतो. पण असे कधीच घडले नाही की आम्ही एकत्र बसून बोललो. कामानंतर आम्ही बोललो नाही. मला वाटतं ती याच गोष्टीला सर्वात जास्त घाबरते”

वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! राज ठाकरेंनी दिले आदेश
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! राज ठाकरेंनी दिले आदेश.
पार्थ पवारांना कोणतीही क्लिनचीट नाही! सूत्रांची माहिती
पार्थ पवारांना कोणतीही क्लिनचीट नाही! सूत्रांची माहिती.
नवी मुबंई महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला
नवी मुबंई महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला.
महापौरपदाच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंचे नगरसेवकांना व्हीप
महापौरपदाच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंचे नगरसेवकांना व्हीप.