AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lock Up Season 2 : सलमान-संजयवरून विचारला नको तो प्रश्न, रितेश देशमुखचा चेहराच उतरला, भडकून म्हणाला..

‘लॉक अप सीजन 2’ च्या इव्हेंट लाँचमध्ये रितेश देशमुखला एक असा प्रश्न विचारण्यात आला की त्याचा चेहराच उतरला. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी साफ दिसत होती. त्यानंतर त्याने दिलेल्या उत्तराने सगळेच अवाक् झाले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Lock Up Season 2 : सलमान-संजयवरून विचारला नको तो प्रश्न, रितेश देशमुखचा चेहराच उतरला, भडकून म्हणाला..
रितेश देशमुखचा व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Jun 23, 2026 | 9:55 AM
Share

अभिनेता रितेश देशमुख सध्या ‘लॉक अप सीझन 2’ (Lock Upp Season 2) मुळे चर्चेत आहे. यावेळी तो फराह खानसोबत या लोकप्रिय रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करणार आहे. या शोच्या लाँचदरम्यान एक घटना अशी घडली जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. लॉक अप सीजन 2 दरम्यान मीडियातील एकाने रितेश देशमुखला त्याचे जवळचे मित्र सलमान खान आणि संजय दत्त यांच्याबद्दल एक असा प्रश्न विचारला, ज्यामुळे अभिनेत्याचा पारा चांगलाच चढला. त्याने सर्वांसमोरच त्या इसमाची शाळा घेतली. त्याची ही प्रतिक्रिया चांगलीच लक्ष वेधून घेणारी ठरली असून व्हिडीओ बराच व्हायरल झालाय.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान, एा पत्रकाराने रितेशला विचारलं की, सलमान खान आणि संजय दत्त, तुमचे जवळचे मित्र, त्यांना ‘लॉक-अप’चा (तुरुंगवासाचा) मोठा अनुभव आहे. मग तुम्ही त्यांना या शोमध्ये (Lock Up Season 2 ) आमंत्रित कराल का जाईल का, आणि तसं झालं तर त्यांना शिक्षा कोणीत दिली जाईल? सलमान आणि संजय दत्तचं नाव ऐकताच आधीच रितेशच्या भुवया उंचावल्या आणि तो प्रश्न पूर्ण ऐकताच त्याचा चेहरा गंभीर झाला. त्याने लगेचच याचे उत्तर देण्यास नकार दिला.

रितेश देशमुख भडकला

बऱ्याचदा खेळीमेळीने वागणारा, मजा करणारा रितेश देशमुख यावेळी मात्र फार गंभीर दिसला. आणि अशा कोणत्याही प्रश्नाचं मी उत्तर देणार नाही, असं सांगत त्याने डायरेक्ट नकार दिला. अशा प्रश्नाचे उत्तर देऊन मला, तुमच्या प्रश्नाला महत्व द्यायची इच्छा नाही, असं त्याने अत्यंत कठोर स्वरात सांगितलं. रितेशच्या मते, हा प्रश्न उत्तरास पात्र नव्हता, त्यामुळे उत्तर देण्यास नकार दिला.

मात्र रितेशच्या या प्रतिक्रियेने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तरीही, वाद घालण्याऐवजी त्याने अत्यंत संयमाने आपली भूमिका मांडली आणि तो पुढे निघून गेला. आपल्या मित्रांबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे रितेश चांगलाच नाराज झाल्याचं यावेळी दिसून आलं. मात्र काही लोकांना त्याचं वागणं उद्धटपणाचं वागलं असून या व्हिडीओवरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.

नेटफ्लिक्सवर रिलीज होणार शो

रितेश देशमुख आणि फराह खान हे दोघे होस्ट करत असलेल्या ‘लॉक अप’ (Lock Upp) या शोचा दुसरा सीझन यावेळी नेटफ्लिक्सवर (Netflix) येणार आहे. या शोचा पहिला सीझन कंगना रणौतने होस्ट केला होता आणि त्या सीझनमधून मुनव्वर फारुकीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट