AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 वर्षांनी मोठ्या ‘अंगुरी भाभी’शी लग्नापूर्वीच का तुटलं नातं? अभिनेत्याने सोडलं मौन

अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि रोमित राज हे एकमेकांशी लग्न करणार होते. परंतु सहा महिन्यांतच त्यांचं नातं तुटलं. यामागचं खरं कारण आता रोमितने एका मुलाखतीत सांगितलं आहे. शिल्पा आणि रोमित हे 'मायका' या मालिकेच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

3 वर्षांनी मोठ्या 'अंगुरी भाभी'शी लग्नापूर्वीच का तुटलं नातं? अभिनेत्याने सोडलं मौन
Shilpa Shinde and Romit RajImage Credit source: Instagram
| Updated on: May 14, 2025 | 9:27 AM
Share

‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि टीव्ही अभिनेता रोमित राज हे ‘मायका’ या मालिकेच्या सेटवर एकमेकांना भेटले. एकत्र काम करताना दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. सहा महिने एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु लग्नापूर्वीच त्यांच्या नात्याला तडा गेला आणि दोघांनी साखरपुडा मोडला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोमितने यामागच्या कारणाचा खुलासा केला.

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत रोमित म्हणाला, “होय मी शिल्पाला डेट केलं होतं, पण ही 16 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही मायका या मालिकेच्या सेटवर भेटलो होतो. तेव्हा मला मुंबईत येऊन दहा वर्षे झाली होती आणि त्यावेळी मी कोणालाच डेट करत नव्हतो. शिल्पा स्वभावाने खूप चांगली होती आणि त्यावेळी तिने माझी खूप मदत केली होती. एकत्र काम करताना आम्ही सहा महिने एकमेकांना डेट केलं आणि आमच्या दोघांच्याही मनात लग्न करण्याची इच्छा होती.”

ब्रेकअपचं कारण सांगताना तो पुढे म्हणाला, “मी माझ्या कुटुंबीयांना शिल्पाविषयी सांगितलं होतं. परंतु सहा महिन्यांनंतर आम्हाला समजलं की आम्ही एकमेकांसाठी बनलेलो नाही. जर आमचं लग्न झालं असतं तर ते फार काळ टिकलं नसतं. माझ्या मते ते नातं संपवण्याचा निर्णय योग्यच होता. आम्हा दोघांचीही ठाम मतं होती आणि गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा होता. तिनेच आधी हे लग्न मोडलं. ब्रेकअप झाल्यानंतर आम्ही कधीच मैत्री ठेवण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यानंतर आम्ही कधी भेटलोसुद्धा नाही.”

शिल्पाने जेव्हा ‘बिग बॉस 11’मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता, तेव्हा तिला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यावेळीही रोमितने सर्वांत आधी तिचा बचाव केला होता. “शिल्पा बिग बॉसच्या घरात असताना लोकांनी मला मेसेज करण्यास सुरुवात केली होती. बरं झालं तू तिच्याशी लग्न केलं नाहीस, असं ते म्हणू लागले. तिच्याविषयी वाटेल ते लिहू लागले. मला माहीत नाही का पण तिच्याबद्दल कोणीही वाईट बोललेलं मला आवडत नाही. एका शोमध्ये फक्त एक तास पाहून तुम्ही त्या व्यक्तीबद्दल वाटेल ते मत बनवू शकत नाही. ती खूप प्रेमळ आणि हुशार मुलगी आहे. मी तिला पाठिंबा दर्शविल्यानंतर तीन महिन्यांनी तिने त्या शोचं विजेतेपद पटकावलं होतं”, असं रोमितने सांगितलं. शिल्पासोबतचं नातं संपुष्टात आल्याच्या काही वर्षांनंतर रोमितने टिना कक्करशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.