AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सैराट’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याची जवळच्या मित्रांकडून फसवणूक, नेमकं काय घडलं?

सैराट चित्रपटातून प्रसिद्ध झालेला बाळ्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी तो आर्थिक संकटामुळे. काय म्हणाला तानाजी?

'सैराट' चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याची जवळच्या मित्रांकडून फसवणूक, नेमकं काय घडलं?
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 07, 2026 | 6:28 PM
Share

Tanaji Galgunde :  ‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातून बाळ्या ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता तानाजी गळगुंडे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनयाच्या प्रवासाबरोबरच आयुष्यात आलेले अनुभव, आर्थिक चढ-उतार आणि त्यातून घेतलेले धडे याबाबत त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.

‘सैराट’ चित्रपटानंतर अचानक मिळालेली प्रसिद्धी आणि पैसा यासाठी आपण मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार नव्हतो, असे तानाजी गळगुंडेने स्पष्टपणे सांगितले. एका मुलाखतीदरम्यान तो म्हणाला की, ‘सैराटनंतर माझ्याकडे चांगले पैसे आले होते. मात्र त्या पैशांचे योग्य नियोजन कसे करावे, याची मला काहीच माहिती नव्हती. आर्थिक अज्ञानामुळे मी मोठी चूक केली.”

तानाजीने सांगितले की, त्या काळात जवळचे मित्र म्हणून ओळखले जाणारे काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. ‘कोणी बिझनेस सुरू करण्याच्या नावाखाली पैसे घेतले तर कोणी गरज असल्याचे सांगून पैसे मागितले. मी कोणताही विचार न करता सगळ्यांना पैसे देत गेलो. पण आज तेच लोक मला ब्लॉक करून बसले आहेत. फोनही उचलत नाहीत. आता मी त्यांना मित्रही मानत नाही, असे त्याने भावनिक शब्दांत सांगितले. मात्र या सगळ्या अनुभवातून आपण खूप काही शिकलो असल्याचेही त्याने नमूद केले.

सैराटनंतर स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी तानाजीने पुस्तक वाचन सुरू केले ज्यामुळे त्याच्या ज्ञानात मोठी भर पडली. सैराटपूर्वीचा तानाजी आणि आजचा तानाजी यात खूप फरक आहे असे तो म्हणतो. मात्र, अभिनय क्षेत्रातील अज्ञानामुळे त्या काळात योग्य निर्णय घेता न आल्याची खंतही त्याने व्यक्त केली. तेव्हा मला जास्त काम करायला हवे होते. योग्य मार्ग दाखवणारा कोणी नव्हता असे तो सांगतो.

नंतरच्या भूमिका फारशा चर्चेत नाहीत

अचानक मिळालेल्या प्रसिद्धीमुळे आपण काही काळ गोंधळून गेलो होतो. हेही तानाजीने मान्य केले. सैराटनंतर त्याने जवळपास 20 ते 22 चित्रपटांत काम केले, मात्र त्यापैकी फारशा भूमिका लक्षात राहण्यासारख्या नव्हत्या असं देखील तो म्हणाला.

आपल्या मूळ आयुष्याविषयी बोलताना तानाजी म्हणाला की, चित्रपटांमध्ये येण्याआधी मी शेती करत होतो. शाळा-कॉलेजमध्ये अभ्यासात फार हुशार नव्हतो, त्यामुळे शेतीच करायची हे ठरलेले होते. सैराटमध्ये अगदी अपघाताने आलो. आजही तो शेती करत असल्याचे त्याने सांगितले. अभिनयाची कामे मिळतील तशी करत असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....