AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्यामुळे सलमान माझा होऊ शकला नाही, अभिनेत्रीचा धक्कादायक आरोप

अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यात हम दिल दे चुके सनम चित्रपटाच्या दरम्यान प्रेम कहाणी सुरु झाली होती. पण ती जास्त काळ टिकू शकली नाही. ऐश्वर्याच्या आधी सलमान खानच्या आय़ुष्यात आणखी एक अभिनेत्री होती. दोघांचे लग्न देखील होणार होते. पण ऐश्वर्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही असा आरोप या अभिनेत्रीने केला आहे.

ऐश्वर्यामुळे सलमान माझा होऊ शकला नाही, अभिनेत्रीचा धक्कादायक आरोप
somy ali
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 20, 2024 | 8:56 PM
Share

Salman and aishwarya : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचे नाते सगळ्यांनाच माहित आहे. दोघांची सुरु झालेली प्रेम कहाणी जास्त काळ टिकू शकली नाही. त्यांच्या ब्रेकअपने त्यांच्या चाहत्यांची देखील निराशा झाली होती. सलमान खानच्या लव्ह लाइफचा जेव्हा ही उल्लेख होतो तेव्हा लोकं ऐश्वर्याचं नाव घेतात. पण ऐश्वर्यापूर्वी सलमानच्या आयुष्यात आणखी एक व्यक्ती होती. सलमान खानला तिच्यासोबत लग्न करायचे होते. दोघांनी लग्नाची योजनाही आखली होती. पण ते लग्न होऊ शकले नाही. सलमान जिच्या प्रेमात पडला होता ती अभिनेत्री होती सोमी अली. जी सलमानची गर्लफ्रेंड होती. सोमी अली हिने सलमान खान सोबतच्या नात्याबद्दल अनेक दावे केले आहेत. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, ऐश्वर्या रायमुळे दोघांचे ब्रेकअप झाले.

सोमी अलीने सांगितले की, जेव्हा संजय लीला भन्साळीच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, तेव्हा ऐश्वर्या आणि सलमानची जवळीक वाढली होती. एके दिवशी तिने शूटिंग करत असताना सलमानला फोन केला होता. पण त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर सोमीने भन्साळींना फोन केला, त्यांनी फोन उचलला आणि सलमानचे शूटिंग सुरू असल्याचे सांगितले. सोमीला हे समजले नाही आणि ती म्हणाली, “जर तो शॉटमध्ये आहे तर ते दिग्दर्शन का करत नाहीयेत, त्यांनी माझा फोन कसा उचलला?”

सोमी म्हणाली की, भन्साळींनी तिला जे सांगितले ते तिच्या समजण्याच्या पलीकडे होते. ते बोलताना अडखळत होते. त्यांना काय बोलावे ते कळत नव्हते आणि नंतर ऐश्वर्या राय सलमानच्या जिममध्ये येऊ लागली. जिथे आम्ही राहत होतो. सलमान आणि मी गॅलेक्सीच्या तळमजल्यावर राहायचो, जिथे आमची जिम देखील होती.

सोमी अलीने सांगितले की, ‘हम दिल दे चुके सनम’ दरम्यान सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील नात्याबद्दल तिला कळले. इतर लोकं तिला सगळी माहिती द्यायचे. आता सलमानच्या आयुष्यातून निघून जाण्याची वेळ आली आहे हे सोमीला समजू लागले होते.

सलमान खान आणि सोमी अली यांच्यातील नाते 1991 मध्ये सुरु झाले आणि 1999 मध्ये आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटादरम्यान संपले. हा तो काळ होता जेव्हा सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही आणि 2002 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा