AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जिवंत राहायचे असेल तर…”, सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा धमकी

सलमान खानला गेल्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत.

जिवंत राहायचे असेल तर..., सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा धमकी
Salman Khan, lawrence bishnoi
| Updated on: Nov 05, 2024 | 10:40 AM
Share

Salman Khan Another Threat : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ संपता संपत नाही. अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. सलमान खानने माफी मागावी, अन्यथा त्याला जीवे मारण्यात येईल, असा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने सलमान खानला ही धमकी दिली आहे.

“मंदिरात येऊन माफी मागावी, अन्यथा…”

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला काल रात्री एक धमकीचा फोन आला होता. यावेळी धमकी देणाऱ्याने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीवजा मेसेज दिला आहे. मी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ बोलत आहे, असा दावा त्याने केला आहे. जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात येऊन माफी मागावी, नाहीतर पाच कोटी रुपये द्यावे. जर त्याने हे केले नाही तर आम्ही त्याला जीवे मारु. आमची गँग आजही सक्रिय आहे, असे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षाला मिळालेल्या धमकीच्या मेसेजनंतर वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. विशेष म्हणजे सलमान खानला गेल्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत. तसेच याप्रकरणाचा तपासही सुरु आहे.

सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर 

दरम्यान, अभिनेता सलमान खान हा लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. सलमान खानने 1998 मध्ये काळविटाची शिकार केली होती, असा आरोप आहे. बिश्नोई समाज हा काळविटाची पूजा करतो. यामुळे लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर १४ एप्रिल रोजी गोळीबार झाला होता.

बाबा सिद्दीकींची हत्या, सलमानची सुरक्षा वाढवली

यानंतर दसऱ्याच्या दिवशी सलमान खानच्या निकटवर्तीय असलेले राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. या दोन्ही घटनांमागे बिश्नोई टोळीचा हात असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी पोलिसांनी अनेक आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. यानंतरही सतत सलमान खानला धमक्या मिळत आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Follow Us
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर