AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारक मेहताचा ‘सोढी’ डिप्रेशनमध्ये? गुरुचरण सिंगबद्दल ‘गोगी’ने केला मोठा खुलासा, म्हणाला, पाच महिन्यांपूर्वी..

Gurucharan Singh : तारक मेहता का उल्टा चश्मा फेम गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यापासून सर्वजण हैराण झालेत. पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत. आता गुरुचरण सिंग याला बेपत्ता होऊन बरेच दिवस झालेत. मात्र, अजूनही गुरुचरण सिंग कुठे आणि असा आहे, याबद्दल काहीच खुलासा हा होऊ शकला नाहीये.

तारक मेहताचा 'सोढी' डिप्रेशनमध्ये? गुरुचरण सिंगबद्दल 'गोगी'ने केला मोठा खुलासा, म्हणाला, पाच महिन्यांपूर्वी..
Gurucharan Singh
| Updated on: May 01, 2024 | 1:19 PM
Share

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करणारा अभिनेता अर्थात गुरुचरण सिंग हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. अभिनेता बेपत्ता होऊन आता आठ दिवसांपेक्षाही अधिक कालावली झालाय. 22 एप्रिल 2024 रोजी गुरुचरण सिंग हा दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. मात्र, गुरुचरण सिंग विमानतळापर्यंत देखील पोहचला नाही. अभिनेता बेपत्ता झाल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठी खळबळ बघायला मिळाली. गुरुचरण सिंग याने अनेक वर्षे तारक मेहता मालिकेत सोढीची भूमिका साकारली. अभिनेत्याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

सोढी बेपत्ता झाल्यानंतर तारक मेहता मालिकेतील कलाकारांना देखील मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच तारक मेहता मालिकेत सोढीच्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता समय शाह याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये समय शाह काही मोठे खुलासे करताना दिसलाय. आता गोगीच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

समय शाह म्हणाल की, माझी आणि गुरुचरण सिंग यांची भेट दिलीप जोशी यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये झाली. यावेळी आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारत बसलो. हेच नाही तर चार पाच महिन्यांपूर्वीच आमचे फोनवर देखील बोलणे झाले, यावेळी आम्ही एक तासांपेक्षाही अधिक वेळ गप्पा मारत बसलो होतो. ते मला त्यांच्या मुलासारखे मानतात.

हेच नाही तर ज्यावेळी माझे आणि त्यांचे बोलणे झाले, त्यावेळी ते माझे मनोबल वाढवत होते. ज्यावेळी माझे आणि त्यांचे बोलणे झाले, त्यावेळी ते खूप खुश होते. बरेच लोक बोलत आहे की, ते डिप्रेशनमध्ये होते, पण मला तसे अजिबातच वाटत नाही. ते त्याप्रकारचे अजिबात नाहीत. पण एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात काय सुरू आहे हे सांगणे फार अवघड आहे.

माझे आणि त्यांचे बोलणे झाले त्यावेळी ते ठिक होते. ते कायमच माझ्याबद्दल विचारणा करत असतं. मला वाटत नाही ते डिप्रेशनमध्ये वगैरे नसतील. समय शाह याने हे देखील सांगितले की, गुरुचरण सिंग हे बेपत्ता झाल्याचे ऐकल्यापासून त्याला मोठा धक्का बसलाय. सुरूवातीला मी यावर अजिबातच विश्वास ठेवाला नाही, परंतू यानंतर मला याबद्दल समजले, असेही समय शाहने म्हटले.

गुरुचरण सिंग  2020 मध्येच तारक मेहता मालिका सोडली. मात्र, असे असतानाही लोक आजही गुरुचरण सिंगला सोढीच्याच नावाने ओळखतात. गुरुचरण सिंग सोशल मीडियावरही सक्रिय होता. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत. चाहते आता गुरुचरण सिंग याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.