AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“किरण माने चुकला, राजकारण्यांपर्यंत घेऊन जाण्याइतकं..”; सविता मालपेकर स्पष्टच बोलल्या

दोन वर्षांपूर्वी अभिनेता किरण माने यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्या वादावर आता अभिनेत्री सविता मालपेकर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाल्या.

किरण माने चुकला, राजकारण्यांपर्यंत घेऊन जाण्याइतकं..; सविता मालपेकर स्पष्टच बोलल्या
Savita Malpekar and Kiran ManeImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 14, 2024 | 2:02 PM
Share

अभिनेते किरण माने यांना 2022 मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. राजकीय भूमिका घेतल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची सुरुवातीला चर्चा होती. नंतर निर्मात्यांकडून त्यांची बाजू मांडण्यात आली. या वादावर आता अभिनेत्री सविता मालपेकर यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. “किरण चांगला आहे, पण चांगली मागणं कधी कधी अशी का वागतात, हे मला कळत नाही. चुका सगळ्यांकडून होतात. पण त्या मान्य करण्याची आणि माफी मागण्याची तयारी असली पाहिजे”, असं त्या म्हणाल्या.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सविता मालपेकर म्हणाल्या, “सेटवरील वादविवाद हे सेटच्या बाहेर जाता कामा नये. गैरसमज झाले तर त्या व्यक्तीला विचारावं. बोलल्याने बऱ्याच गोष्टी ठीक होतात. सर्वांना एकत्र काम करायचं असताना हेवेदावे किंवा तोंड वाकडं करून चालत नाही. दुसरी गोष्टी म्हणजे एका व्यक्तीमुळे सेटवरील 100 लोक उपाशी मरता कामा नये. किरणला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून न सांगता काढलेलं नव्हतं. त्याला वाहिनीने चार वेळा इशारा दिला होता. नेमकं कोणत्या कारण्यासाठी त्याला काढलं हे मलाही नीट माहीत नाही. त्यावेळी माझं दुसरं शूटिंग सुरू होतं. मालिकेच्या शूटिंगदरम्यान एका मिटींगमध्ये किरणने माफीसुद्धा मागितली होती. तरी नंतर त्याला का काढलं, हे मला माहीत नाही.”

“किरण चुकला होता असं मला वाटतं. राजकारण्यांपर्यंत हे प्रकरण घेऊन जाण्याइतकं काही झालेलंच नव्हतं. किरणचं हे स्वत:चं डोकं नव्हतं. त्याच्या मागे एक शक्ती होती आणि त्यामुळे तो हे सर्व करत होता, असं माझं ठाम मत आहे. आपण चुकत असताना कुठे थांबलं पाहिजे हे माणसाला कळलं पाहिजे. इतरांचंही चुकलंच असेल. पण किरणने कुठेतरी थांबलं पाहिजे होतं, असं मला वाटत होतं. एकदा तो दिग्दर्शकाच्या अंगावर धावून गेला होता. सेटवर हे असं वागणं चुकीचं होतं”, असं मालपेकर यांनी सांगितलं.

किरण माने हे सोशल मीडियावर विविध मुद्द्यांवरून सतत पोस्ट लिहित असतात. अशाच एका पोस्टमुळे त्यांना मुलगी झाली हो या मालिकेतून बाजूला केल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र त्यांना राजकीय भूमिकेमुळे नाही तर इतर कारणांमुळे मालिकेतून काढण्यात आलं आणि त्याची त्यांना कल्पनाही होती, असा दावा निर्मात्या सुझाना घई यांनी केला होता. किरण माने यांना अनेकदा सूचना केल्या होत्या. पण तरीही समाधान न झाल्याने त्यांना काढण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं निर्माते म्हणाले होते.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.