AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आहेस कोण तू… जया बच्चन यांच्या वागणुकीवर मुकेश खन्नांचा संताप, म्हणाले, ‘त्यांच्या घरातूनच काही…’

Mukesh Khanna on Jaya Bachchan: मुकेश खन्ना यांनी साधला जया बच्चन यांच्यावर निशाणा, त्यांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थितीत करत म्हणाले, 'आहेस कोण तू, काय पाहिजे आणि...', अनेकांनी साधला आहे जया बच्चन यांच्यावर निशाणा

आहेस कोण तू... जया बच्चन यांच्या वागणुकीवर मुकेश खन्नांचा संताप, म्हणाले, 'त्यांच्या घरातूनच काही...'
| Updated on: Aug 17, 2025 | 10:10 AM
Share

Mukesh Khanna on Jaya Bachchan: अभिनेत्री जया बच्चन यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर, त्यांनी राजकारणात देखील स्वतःची ओळख भक्कम केली आहे. पण जया बच्चन कायम वादाच्या भोवऱ्यात असतात. आता देखील असंच काही झालं आहे. सध्या जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये फोटो क्लिक करण्यासाठी आलेल्या एक चाहत्याला त्यांनी धक्का दिला… व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला.

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्यानंतर अभिनेते मुकेश खन्ना यांनी जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला. मुकेश खन्ना म्हणाले, ‘माध्यमांसोबत त्यांचं वर्तन काही योग्य नाही. आहेस कोण तू, काय करतोय, काय हवंय… आज माध्यमांमुळे तुम्ही आहात…’

पुढे मुकेश खन्ना म्हणाले, ‘सध्या राज्यसभेत जया बच्चन ज्या प्रकारे बोलतात, असं वाटतं त्या बिघडल्या आहेत किंवा त्यांच्या घरातूनच काहीतरी… किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलण्यासाठी त्या असं करतात…’ सांगायचं झालं तर, जया बच्चन यांच्या वागणुकीवर असंख्य लोकं तिव्र संताप व्यक्त करत आहेत…

काय म्हणाल्या कंगना राणौत?

जया बच्चन यांच्या वागणुकीवर निराशा व्यक्त करत कंगना म्हणाल्या, ‘जया बच्चन एक बिघडलेल्या आणि विशेषाधिकारप्राप्त स्त्री आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी असल्यामुळे त्यांना सगळे सहन करत आहेत…’, सध्या सर्वत्र जया बच्चन यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

अशोक पंडित यांच्याकडून नारीजी व्यक्त

निर्माते अशोक पंडित यांनीही जया बच्चन यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. पोस्ट करत ते म्हणाले ‘हे अत्यंत निंदनीय आहे. ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं,त्यांच्याबद्दल असा अपमान करणं चुकीचं आहे. एक लोकसेवक 24 तास रागावलेला राहू शकत नाहीत. त्यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकाराकडून करुणेची अपेक्षा असते, कारण त्यांच्या चाहत्यांनी दिलेल्या प्रेमामुळेच त्यांना हे स्थान मिळाले आहे.” अनेकांनी जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.