AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: भारताने सामना नेमका कुठे गमावला? कर्णधार शुबमन गिलने त्या तीन षटकांचा केला उल्लेख

भारताने इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका अखेर 1-2 ने गमावली आहे. शेवटच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 27 धावांनी पराभव केला. खरं तर एक वेळ अशी होती की भारत हा सामना जिंकेल, पण शेवटी पराभव सहन करावा लागला.

IND vs ENG: भारताने सामना नेमका कुठे गमावला? कर्णधार शुबमन गिलने त्या तीन षटकांचा केला उल्लेख
IND vs ENG: भारताने सामना नेमका कुठे गमावला? कर्णधार शुबमन गिलने त्या तीन षटकांचा केला उल्लेखImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 20, 2026 | 1:26 AM
Share

इंग्लंडमध्ये टी20 मालिका गमावल्यानंतर भारताची वनडे मालिकेतही पराभव झाला आहे. भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 1-2 ने गमावली आहे. खरं तर या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकून आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर सलग दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आणि मालिका हातून गेली. तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 360 धावा केल्या आणि सामना 27 धावांनी गमावला. या सामन्यानंतर पराभवानंतर कर्णधार शुबमन गिलने काय चुकलं? ते सांगितलं. नेमका पराभव कुठे झाला ते सांगून टाकलं. शुबमन गिल म्हणाला की, ‘मला वाटतं की 45 व्या षटकापर्यंत आम्ही सामन्यात बरोबरीत होतो. शेवटच्या तीन षटकांमध्ये आम्ही खूप जास्त धावा दिल्या. मला वाटतं, जवळपास 60 धावा दिल्या. तिथूनच सामना आमच्या हातून थोडा जास्तच निसटला.’

इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 388 धावांचा पाठलाग करताना जिंकण्याचा विश्वास होता का? या प्रश्नावर शुबमन गिल म्हणाला की, ‘ हो, नक्कीच, आम्हाला वाटलं होतं की जर 40 षटकांनंतर आमच्या हातात विकेट्स राहिल्या असत्या तर आम्ही सामन्यात असतो. पण त्याच वेळी आम्हाला सामन्यात खूप मागे पडायचं नव्हतं. त्यामुळे मला वाटतं की पॉवरप्लेनंतर आम्ही धावफलकावर धावा जमा करायला सुरुवात केली, धावगती सहा साडेसहाच्या आसपास आणली. जर आम्ही सहा साडेसहाच्या आसपास खेळत राहिलो असतो आणि मग शेवटच्या 10 षटकांमध्ये 100, 110 धावा केल्या असत्या, तर काय झालं असतं हे सांगता येत नाही.’

इंग्लंडविरुद्धची मालिका गमावली पण सकारात्मक काय घडलं का? त्यावर शुबमन गिल म्हणाला की, ‘जवळपास प्रत्येकाने सामन्यांमध्ये धावा केल्या. मला वाटतं की विशेषतः या सामन्यात आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. खासकरून पॉवरप्लेमध्ये. मला वाटतं की आम्ही पॉवरप्लेमध्ये खूप जास्त ऑफ-बॉल टाकले. आणि मग पॉवरप्लेनंतर दोन्ही सलामीवीरांनी ज्या प्रकारे त्याचा फायदा घेतला, ते खरंच जबरदस्त होतं. त्यांनी आम्हाला सामन्यात परत येण्याची संधीच दिली नाही. आणि मग शेवटच्या षटकांमध्ये, जसं मी म्हणालो, ते आमच्यापेक्षा खूप पुढे गेले होते. पण या मालिकेत आमच्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी आहेत, जवळपास प्रत्येकाने धावा केल्या आणि विकेट्स घेतल्या.’

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या योगदानाबाबत शुबमन गिलने आपलं मत व्यक्त करत सांगितलं की, ‘ त्यांनी गेल्या काही वर्षांत जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्मा आज ज्या प्रकारे फलंदाजीला आला, विशेषतः 140 धावा केल्याबद्दल मला खूप खूप आनंद झाला आहे. मला वाटतं की शेवटी खेळपट्टी थोडी संथ झाली होती. त्या धावा करणे सोपे नव्हते. पण मला वाटतं की तो ज्या प्रकारे फलंदाजीला आला, ते पाहणे खरोखरच एक पर्वणी होती.’

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?