AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boycott Trend: “टोकाची विधानं करण्यापेक्षा..”, श्रेयस तळपदेचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सल्ला

अर्जुन कपूर, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि आमिर खान यांना ज्या पद्धतीने ट्रोल केलं गेलं, त्यांचे चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले त्याबद्दलही त्याने चिंता व्यक्त केली.

Boycott Trend: टोकाची विधानं करण्यापेक्षा.., श्रेयस तळपदेचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सल्ला
श्रेयस तळपदेचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सल्ला Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 09, 2022 | 4:12 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडसाठी अत्यंत कठीण काळ सुरू आहे. एकीकडे सोशल मीडियावर बॉयकॉटचा ट्रेंड (Boycott Trend) सुरू असताना दुसरीकडे मोठमोठ्या कलाकारांचेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटत आहेत. बॉयकॉट ट्रेंडवर काही कलाकार मोकळेपणे व्यक्त झाले. आता अभिनेता श्रेयस तळपदेनं (Shreyas Talpade) याविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे त्याने अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रतिक्रियांवरही टीका केली आहे. तुम्हाला चित्रपट आवडत नसेल तर तो पाहू नका, असंच थेट आलिया (Alia Bhatt) म्हणाली होती. मात्र “चित्रपट म्हणजे प्रेम आहे आणि हे काम म्हणजे जणू तुमची गर्लफ्रेंड आहे. तुमची गर्लफ्रेंड जर रागावली असेल, नाराज असेल तर तिला सोडून देऊ नका, तिची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करा,” असं श्रेयस म्हणाला.

‘इक्बाल’ ते ‘कौन प्रवीण तांबे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या श्रेयसने ‘न्यूज 18 लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत बॉयकॉट ट्रेंडबद्दल आपलं मत मांडलं. अर्जुन कपूर, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि आमिर खान यांना ज्या पद्धतीने ट्रोल केलं गेलं, त्यांचे चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले त्याबद्दलही त्याने चिंता व्यक्त केली.

कलाकारांच्या काही विधानांवर टीका करताना श्रेयस म्हणाला, “सध्या इंडस्ट्रीत जी वक्तव्ये केली जात आहेत ती मला आवडत नाहीत. इंडस्ट्रीशी निगडित काही लोक यावेळी जे वक्तव्य करत आहेत त्यावर मी खूश नाही. आम्ही सर्व इंडस्ट्रीत काम करतो. आम्हाला काम करण्याची संधी मिळाली याबद्दल बाप्पाचे आभार मानले पाहिजेत. अशा स्थितीत जी प्रकारची विधाने येत आहेत, ती मला आवडत नाहीत.”

आपला मुद्दा मांडताना तो पुढे म्हणाला, “तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल, तुमची गर्लफ्रेंड असेल आणि ती तुमच्यावर नाराज असेल, रागावली असेल, तर तुम्ही तिला थेट सोडून देत नाही. तुम्ही तिला थांबवता, तिचं मन राखण्याचा प्रयत्न करता. मला वाटतं प्रेक्षक आमच्यासाठी त्या प्रेयसीसारखेच आहेत. ते आमच्यावर रागावले असतील तर त्यांचं मन राखणं हे आमचं कर्तव्य आहे. आपण त्यांना त्यामागचं कारण विचारलं पाहिजे. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा.”

“चित्रपटसृष्टीतील काही लोक काहीही म्हटले तरी, मी प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही आमचं काम पहा. तुम्ही आमचे चित्रपट पहा. OTT वर आमची मालिका पहा. जर प्रेक्षकांनीच आमचं काम पाहिलं नाही तर आम्हा कलाकारांच्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही,” अशी विनंतीदेखील त्याने केली.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?