AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टार प्रवाहवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

या नव्या मालिकेत ईशा केसकर आणि अक्षर कोठारीची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून ईशाचा वेगळाच अंदाज चाहत्यांना पहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका आता नव्या वेळेत प्रसारित होणार आहे.

स्टार प्रवाहवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
Akshar Kothari Image Credit source: Tv9
| Updated on: Oct 27, 2023 | 3:01 PM
Share

मुंबई : 27 ऑक्टोबर 2023 | स्टार प्रवाहवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या लोकप्रिय आहेत. या मालिका प्रेक्षक वेळ न चुकवता पाहतात आणि चुकल्यास नंतर ओटीटीवर ती पाहण्याची संधी सोडत नाहीत. अशातच एखाद्या मालिकेला प्रेक्षकांकडून कमी प्रतिसाद मिळत असेल, तर ती मालिका बंद करण्यात येते आणि त्याजागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली जाते. स्टार प्रवाह वाहिनीवरील अशीच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सुरू होणार आहे. यामध्ये ईशा केसकर आणि अक्षर कोठारी अशी नवी जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाहवरून निरोप घेणारी ही मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात या मालिकेला अपयश आलं. त्याचाच परिणाम टीआरपीवर झाल्याने आता ही मालिका बंद करण्यात येत आहे. त्याच्या जागी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बंध रेशमाचे’, ‘छोटी मालकीण’, ‘स्वाभिमान’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अक्षर कोठारी या मालिकेतून नव्या रुपात समोर येणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेत अक्षर हा अद्वैत चांदेकर ही व्यक्तिरेखा साकारताना दिसेल.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

मालिकेती अद्वैत हा बिझनेसमन आहे. वडिलोपार्जित चालत आलेला सोनं, चांदी आणि हिऱ्यांचा बिजनेस तो एकटा सांभाळतोय. बिझनेसशी निगडित असलेली प्रत्येक गोष्ट तो खूप प्रामाणिकपणे करतो. तो जे पारखून घेईल त्यात चूक शोधूनही सापडणार नाही. अद्वैत चांदेकर या व्यक्तिरेखेविषयी सांगताना अक्षर म्हणाला, “स्टार प्रवाहसोबत माझं जुनं नातं आहे. प्रवाह कुटुंबाचा भाग असल्याचा मला आनंद आहे. दिवाळीच्या धामधुमीत माझी लक्ष्मीच्या पाऊलांनी ही नवी मालिका भेटीला येतेय. स्वाभिमान संपल्यानंतर नवीन काय अशी सातत्याने विचारणा होत होती. लक्ष्मीच्या पाऊलांनीच्या निमित्ताने नवं पात्र साकारायला मिळत आहे. इशा केसकरसोबत मी पहिल्यांदाच काम करतोय. भेटताक्षणीच आमची छान मैत्री झाली.” लक्ष्मीच्या पाऊलांनी ही नवी मालिका येत्या 20 नोव्हेंबरपासून रात्री 9.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

Follow Us
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार