AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठमोळ्या अभिनेत्रीमुळे गोविंदाचे घर तुटणार? सुनीताला अश्रू अनावर, थेट मंदिरात जाऊन…

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने यूट्यूब चॅनेल सुरु केले आहे. यासाठी शूट केलेला पहिला एपिसोड हा मंदिरातील आहे. व्हिडीओमध्ये ती मंदिरात पोहोचल्याचे दिसत आहे. दरम्यान, तिला अश्रू अनावर झाले आहेत. तसेच जो कोणी माझे घर तोडण्याचा प्रयत्न करेल, माता त्याला सोडणार नाही, मग तो आपला असो वा परका असे ती बोलताना दिसत आहे.

मराठमोळ्या अभिनेत्रीमुळे गोविंदाचे घर तुटणार? सुनीताला अश्रू अनावर, थेट मंदिरात जाऊन...
Govinda and SunitaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 15, 2025 | 1:29 PM
Share

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यात सर्व काही ठीक आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या चर्चांना तेव्हा सुरुवात झाली जेव्हा गोविंदाची पत्नी सुनीताने मीडियाशी संवाद साधताना संशय व्यक्त केला. अनेकांनी गोविंदा एका मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले आहे. तसेय या अभिनेत्रीमुळे गोविंदाचा संसार मोडणार असे देखील म्हटले. आता सुनीताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये संताप व्यक्त केला आहे. तसेच तिला बोलताना अश्रू देखील अनावर झाले आहेत.

असे म्हणतात की जीवनात सुखाच्या मागे दु:ख आणि दु:खाच्या मागे सुख असते. पण हेही खरे आहे की दु:खाच्या वेळीच आपल्या लोकांचे खरे चेहरे समोर येतात. गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्यात गेल्या काही काळापासून मतभेदाच्या बातम्या येत आहेत. दोघेही वेगवेगळे राहतात. याचे कारण सुनीता यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. पण त्यांच्या विधानांमुळे अनेकदा अशा चर्चांना उधाण येते.

वाचा: सचिन तेंडुलकरची सून एका Dog Bathचे किती पैसे घेते? अर्जुनच्या होणाऱ्या पत्नीचे लग्झरी पेट सलून

महाकाली माता मंदिरात पोहोचल्या

सुनीता आहुजा आता फक्त गोविंदाची पत्नी नसून एक नवीन यूट्यूबर म्हणून समोर आली आहे. ती व्हलॉगमध्ये म्हणाली की, ‘आधीच आयुष्य खूप कटू झाले आहे…’ तिच्या पहिल्या व्हलॉगमध्ये ती चंदीगडच्या जंगलात असलेल्या महाकाली माता मंदिरात पोहोचली आहे. तिने सांगितले की या मंदिराबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, त्यामुळे इथे गर्दी कमी असते.

सुनीताने सांगितले की ती देवीची भक्त आहेत आणि जेव्हा कोणी चुकीचे बोलते तेव्हा मला खूप राग येतो, कारण मी न्यायप्रिय व्यक्ती आहे. मंदिरात पंडितांशी बोलताना तिने हे सांगितले, तेव्हा पंडित म्हणाले, जो खरा असतो, त्याला खूप राग येतो. संभाषणात जेव्हा त्यांना विचारले गेले की त्यांनी पहिली मन्नत कधी मागितली, तेव्हा सुनीता भावूक झाली. रडत तिने सांगितले, ‘लहानपणापासून मी आईसोबत मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात जायचे. माझी आई मला तिथे घेऊन जायची. मी 8-9 वर्षांची असताना तिथे जायला लागले.’

पहिल्यांदा मन्नतीत गोविंदा मागितला

सुनीता यांनी सांगितले की जेव्हा मी गोविंदाला भेटले, तेव्हा मी मातेच्या मंदिरात जाऊन त्याला मागितले, माझे लग्न गोविंदाशी व्हावे आणि आयुष्य चांगले जावे. त्यांनी सांगितले की मी मातेला खूप मानते, माझ्यासाठी सर्व काही तीच आहे. इच्छा पूर्ण झाली, लग्न झाले, मला मुलेही मिळाली. त्यांनी पुढे सांगितले की प्रत्येक सुख मिळवणे सोपे नसते. आयुष्यात चढ-उतार येतात. पण मला मातेवर इतका विश्वास आहे की कोणी माझे घर तोडण्याचा प्रयत्न केला, तर मला माहित आहे की महाकाली माता तिथे आहे. त्यांनी सांगितले की मला माहित आहे की जो माझे मन दुखावेल, त्याच्यासोबत माता काय करेल. कारण चांगल्या माणसाला आणि चांगल्या स्त्रीला दुखवणे चांगली गोष्ट नाही.

‘जो कोणी माझे घर तोडण्याचा प्रयत्न करेल…’

गोविंदाच्या पत्नीने भावूक होऊन सांगितले, मला कोणावर विश्वास नाही, फक्त माता राणीवर… माझ्या तीनही माता एकत्र आहेत. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, आणि तिघींनाही मी माझ्या आईसारखे मानते. त्यांनी पुढे सांगितले की आज ज्या काही परिस्थिती आहेत किंवा जो कोणी माझे घर तोडण्याचा प्रयत्न करेल, माता त्याला सोडणार नाही, मग तो आपला असो वा परका.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.