AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तारक मेहता..’ सोडून गेलेल्यांवर ‘अब्दुल’ची टीका; म्हणाला “तुमच्या नशिबात..”

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत अब्दुलची भूमिका साकारणारा अभिनेता शरद संकलाने सोडून गेलेल्या कलाकारांवर टीका केली आहे. मालिका सोडून गेलेले कलाकार आज दुसरीकडे कुठेच दिसत नाहीत, असं तो म्हणाला.

'तारक मेहता..' सोडून गेलेल्यांवर 'अब्दुल'ची टीका; म्हणाला तुमच्या नशिबात..
शरद संकलाImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 09, 2026 | 10:03 AM
Share

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावर दीर्घकाळापासून सुरू आहे. यातील कलाकार लहानाची मोठी झाली आणि त्यादरम्यान काहींनी या मालिकेला रामरामसुद्धा केला. ही मालिका सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक असली तरी गेल्या काही वर्षांपासून ती विविध वादांमुळे सतत चर्चेत आहे. यामध्ये काम केलेल्या काही कलाकारांनी मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. कोणी गैरवर्तनाचा तर कोणी पैसे थकवल्याचा आरोप करत मालिकेतून काढता पाय घेतला. यात शैलेश लोढा, जेनिफर मिस्त्री, प्राजक्ता शिसोडे यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. आता यामध्ये अब्दुलची भूमिका साकारणारा अभिनेता शरद संकलाने पहिल्यांदाच या संपूर्ण वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद म्हणाला, “काम सोडल्यानंतर जर तुमच्या हाती काही काम नसेल तर तुम्ही दुसऱ्यांवर आरोप करता. हे चुकीचं आहे. कोणावरही असे आरोप करू नये. तुमच्या नशिबात तेवढंच काम होतं आणि तुम्ही ते सोडून गेला होता. तुम्ही निघून जा असं तुम्हाला कोणी बोललं नव्हतं.” यावेळी त्याने निर्माते असित कुमार मोदी यांचं कौतुक केलं. “मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी खूप चांगले आहेत. निर्माते तर बरेच आहे, पण हे निर्माते म्हणून परफेक्ट आहेत. त्यांचं कमिटमेंटचं खास आहे. पगारपाणी अगदी वेळेत येतं. एक दिवस कधी वर-खाली झाल्याचं मला आठवत नाही. मी माझ्या करिअरमध्ये अशा ठिकाणीही काम केलंय, जिथे शो बंद व्हायचे आणि मला पैसे मागायला त्यांच्या ऑफिसच्या चकरा माराव्या लागायच्या. कलाकाराला वेळीच मानधन मिळणं गरजेचं असतं. यासाठी मला असित मोदी बेस्ट वाटतात. ते सर्वांची चौकशी करतात, मदत करतात”, असं त्याने पुढे सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by SCREEN (@ieentertainment)

यावेळी शरदने मालिकेतून बाहेर पडलेल्या कलाकारांवर टीका केली. “जे लोक ही मालिका सोडून गेले, त्यांनी आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलं. तुम्ही तुमच्या मर्जीने गेलात, यात असित कुमार मोदींचंही नुकसान झालं असेल. त्यांच्यात काय करार झाला असेल, हा त्यांच्यातला मुद्दा आहे. प्रेक्षक म्हणून मी असं म्हणेन की जे लोक मालिका सोडून गेले, ते आज कुठेच दिसत नाहीत. ‘तारक मेहता..’ नाही तर दुसरी मालिकासुद्धा करू शकत नाहीयेत. सर्वांचा आपला वैयक्तिक निर्णय असतो”, असं मत त्याने मांडलंय.

सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल.
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्....
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा.
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल.
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास.
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला.
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात.
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं.
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?.
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला.