AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? जयंत पाटील यांनी दिलं एका वाक्यात उत्तर… आता विषय…

अजित पवार आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजितदादांच्या निधनानंतर तीव्र झाली होती. शरद पवार गटाकडून एकत्रीकरणाचे दावे केले जात होते, परंतु अजित पवार गटाने मौन बाळगले. आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलंय.

NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? जयंत पाटील यांनी दिलं एका वाक्यात उत्तर... आता विषय...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत काय म्हणाले जयंत पाटील ?Image Credit source: social media
| Updated on: Mar 04, 2026 | 12:41 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट, या दोन्ही पक्षांचं विलीनीकरण होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुखनेते, अजित पवार यांच्या अकस्मात, अपघाती निधनानंतर तर या विलीनीकरणाच्या चर्चेने खऊपच जोर धरला होता. अजित दादा व शरद पवार गटातील नेत्यांच्या अनेक बैठका झाला, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी दादांची इच्छा होती, अशी विधान शरद पवार गटाच्या नेत्यांकडून सातत्याने केल्या जात होत्या. मात्र अजित पवार गटातील नेते, तसेच सुनेत्रा पवार यांनी यावर स्पष्टपणे भाष्य केलं नव्हतं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे देखील करण्यात आले होते. आता याचसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत आता राष्ट्रवादीच्याच एका मोठ्या नेत्याने अत्यंत महत्वाचं विधान केलं आहे.

विनीनीकरणावरून अनेक दावे

अजितदादा हयात असताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी हालचाली केल्या, असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर या 12 फेब्रुवारी रोजी अजितदादा हे राष्ट्रवादी विलीनीकरणाची घोषणा करणार होते. विलीनीकरणानंतर पक्षाची सर्व धुरा अजितदादांकडे सुपूर्त करण्याचा निर्णय सुद्धा शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी केला होता, असा दावा शरद पवार गोटातून करण्यात आला होता. मात्र अजित दादांच्या गटातील नेत्यांनी याबाबत कानावर हात ठेवले होते. तर आता अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील कोणीच या विषयावर बोलण्यास तयार नाही. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी अद्यापही मौन बाळगलं आहे.

शरद पवार यांच्या गटातून मात्र वेळोवेळी विलीनीकरणाबाबत विधान करण्यात आली होती. मात्र समोरून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हा विषय आता मागे पडतो की काय अशा चर्चा सुरू झाल्या. याचदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील वरिष्ठ नेते जयंत पवार यांनी यासंदर्भात महत्वाचं विधान केलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील ?

विलनीकरणाची चर्चा आता नाही… विलीनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे थांबलेली आहे. (आधी) ज्यांच्यासोबत विलीनीकरणाची चर्चा सुरू होती, ते नेते (अजित पवार) आता हयात नाहीत. दोन्ही पक्षांचं विलीनीकरण व्हावं, याची सुरवात अजित पवार यांच्याकडून सुरु झाली होती. मात्र आता ते या जगात नाहीत. त्यामुळे आत्ता दोन पक्षांचं विलीनीकरण होणार नाही, असं जयंत पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. इतर दोन पक्षांना सुद्धा हे माहिती झालं आहे, असंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे खळबळ माजली असून विलीनीकरणाला पूर्णविराम मिळाला का, अशी चर्चा सुरू झाली आहे. यापुढे काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Follow Us
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.