AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या काही सेकंदांच्या फरकामुळे थोडक्यात बचावला साऊथ सुपरस्टार; शेअर केला भयानक Video

त्या अवघ्या काही सेकंदांचा खेळ कॅमेरात टिपला गेला आहे. विशालने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि देवाचे आभार मानले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल!

अवघ्या काही सेकंदांच्या फरकामुळे थोडक्यात बचावला साऊथ सुपरस्टार; शेअर केला भयानक Video
Vishal Krishna ReddyImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 23, 2023 | 2:26 PM
Share

चेन्नई : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेक घडामोडी घडत असतात. यात अनेकदा ॲक्शन सीन्सचं शूटिंग करताना अपघातही घडतात. ॲक्शन सीन्स शूट करणाऱ्या कलाकारांना दुखापती होतात तर कधी अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने मोठा अपघात टळतो. अशीच घटना प्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी याच्यासोबत घडली आहे. विशाल त्याच्या आगामी ‘मार्क अँटनी’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता, त्यावेळी सेटवर मोठा अपघात घडता घडता वाचला. त्या अवघ्या काही सेकंदांचा खेळ कॅमेरात टिपला गेला आहे. विशालने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि देवाचे आभार मानले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल!

मार्क अँटनीच्या शूटिंगदरम्यान सेटवर कास्ट आणि क्रूची मोठी गर्दी होती. अत्यंत महत्त्वपूर्ण सीनचं शूटिंग सुरू होतं. यावेळी सेटवर ट्रकचा वापर केला गेला. मात्र अचानक ट्रकचालकाचा ताबा सुटला आणि तो वेगाने पुढे निघाला. ज्याठिकाणी एक ज्युनिअर आर्टिस्ट त्याच्या शॉटसाठी उभा होता आणि त्याच्यासोबत विशालसुद्धा होता. त्याच दिशेने हा ट्रक निघाला.

चित्रपटातील सीनमध्ये, ट्रकला एका भिंतीला तोडून पुढे थांबायचं होतं. मात्र ट्रकचालकाचं नियंत्रण सुटतं आणि तो थांबण्याऐवजी सुसाट पुढे जातो. यामुळे सेटवर गोंधळ निर्माण होतो. सुदैवाने लोकांची नजर त्या ट्रकवर जाते आणि सर्वजण दुसऱ्या दिशेने धावतात. याच घटनेत विशाल बालंबाल बचावतो. काही तांत्रिक बिघाडामुळे ट्रकचालकाचं नियंत्रण सुटल्याची माहिती समोर येत आहे.

पहा व्हिडीओ

विशाल कृष्ण रेड्डीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘फक्त काही सेकंदांचा फरक आणि इंचांच्या अंतराने माझा जीव वाचला. मी देवाचे आभार मानतो. या घटनेनंतर मी सुन्न झालो होतो. मात्र आता ठीक आहे आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात केली आहे’, असं त्याने लिहिलं.

विशालचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहतेसुद्धा थक्क झाले आहेत. विशालचे चाहते त्याचा जीव वाचल्याबद्दल देवाचे आभार मानत आहेत. मार्क अँटनी या चित्रपटाचं दिग्दर्शन अधिक रविचंद्रन करत आहेत. यामध्ये विशालसोबतच रितू वर्मा, अभिनय आणि एसजे सूर्या यांच्या भूमिका आहेत.

विशाल हा प्रसिद्ध चित्रपट निर्माते जीके रेड्डी यांचा मुलगा आहे. विशाल त्याच्या चित्रपटातील जबरदस्त ॲक्शन सीनसाठी ओळखला जातो. त्याचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊससुद्धा आहे. त्याचं नाव विशाल फिल्म फॅक्ट्री असं आहे. त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 2004 मध्ये त्याने अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.