Bigg Boss 14| बिग बॉसच्या घरामध्ये जोरदार हंगामा!

बिग बॉस 14'  (Bigg Boss 14) कलर्स टीव्हीने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आज बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा बघायला मिळत आहे.

Bigg Boss 14| बिग बॉसच्या घरामध्ये जोरदार हंगामा!
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 7:03 PM

मुंबई : ‘बिग बॉस 14’  (Bigg Boss 14) कलर्स टीव्हीने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आज बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा बघायला मिळत आहे. विकास गुप्ता आणि अर्शी खान यांच्यामध्ये जोरदार भांडणे होताना दिसत आहेत. बिग बॉसने घरातील सदस्यांना अगोदरच सांगितले आहे शारिरीक बळाचा वापर घरात करायचा नाही. मात्र, प्रोमोमध्ये दिसत आहे विकास गुप्ता आणि अर्शी खान दोघेही शारिरीक बळाचा वापर करत आहेत. यामुळे बिग बॉस या दोघांना काय शिक्षा देतात.(Bigg Boss’s house will see a strong arguments)

विकास गुप्ता या खेळाचे मास्टर माइंड मानले जाते. मात्र या हंगामात विकासची जादू दिसत नाही. तर दुसरीकडे, अर्शी खान वारंवार विकासाला लक्ष्य करताना दिसत आहे. खरं तर विकास गुप्ताला बिग बॉसने 5 आव्हाने दिले आहेत.

बिग बॉस घरातील सदस्यांना एक टास्क देतात. त्या टास्क वेळी एजाज खान कश्मिरा शहाला जोरदार ढकलतो. ज्यामुळे ती जमिनीवर पडते. हे पाहून रुबीना आणि जास्मीन एजाज खानला भांडताना दिसत आहेत. या घडलेल्या घटनेमुळे बिग बॉस टास्क थांबवायला सांगतात. मात्र, यानंतर हा टास्क कोण जिंकते हे पाहण्यासारखे ठरेल.

रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे दोघे नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार होते, असा धक्कादायक खुलासा रुबीनाने केला होता. ही गोष्ट रुबीनाने नॅशनल टीव्हीवर सर्वांसमोर शेअर केली होती आणि रूबीना सांगते की, मी आणि अभिनवने ऐकमेकांना नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला होता आणि हेच कारण होते की आम्ही बिग बॉसमध्ये आलो. हे सर्व सांगताना रूबीना रडताना दिसली होती. ‘इम्युनिटी स्टोन’ मिळवण्यासाठी बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी आपआपली रहस्ये उघड केली आहेत. मात्र इम्युनिटी स्टोन एजाज खानला मिळाला आहे. एकता कपूरने ‘इम्युनिटी स्टोन’ रूबीनाला दिला होता. ज्याच्या सहाय्याने रूबीना एकदा नॉमिनेशन प्रक्रियेतून सुरक्षित राहु शकत होती. परंतु रुबीनाने अद्याप इम्युनिटी स्टोन वापरला नाही. बिग बॉसने रुबीनाला इम्युनिटी स्टोनचा वापर करण्याविषयी विचारले होते. मात्र, तिने इम्युनिटी स्टोन वापरण्यास नकार दिला होता.

अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताला राग आला होता. कविता बिग बॉसला म्हणते की, अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही. त्याचवेळी रुबीना कविताला बोलण्यासाठी जाते. त्यावेळी कविता रुबिनाला सांगते की, अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो. तुला कदाचित अभिनवने कधी सांगितले नसेल. त्यावेळी रूबीना कविताला म्हणते मला माहिती आहे. मात्र, हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता. रूबीना अभिनवला म्हणते की, तु मला कधी सांगितले नाही की, तु आणि कविती फ्रेंड्स विथ बेनिफिट होतात. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद झाला होता.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | रुबिना दिलैक पाठोपाठ कविता कौशिकचा ‘बिग बॉस’वर गंभीर आरोप!

Bigg Boss 14 | बिग बॉस घरातील ‘व्हिलन’ ठरल्या रूबीना, निक्की आणि जास्मीन

(Bigg Boss’s house will see a strong arguments)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.