AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hruta Durgule: हृता दुर्गुळेनं सोडली ‘मन उडु उडु झालं’ मालिका; समोर आलं कारण

हृताने (Hruta Durgule) मालिका सोडली असली तरी 'दादा एक गुड न्यूज आहे' हे तिचं नाटकसुद्धा नाट्यरसिकांच्या भेटीला येतंय. त्याचसोबत तिचा 'अनन्या' हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

Hruta Durgule: हृता दुर्गुळेनं सोडली 'मन उडु उडु झालं' मालिका; समोर आलं कारण
Hruta DurguleImage Credit source: Instagram
| Updated on: May 01, 2022 | 12:27 PM
Share

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘मन उडु उडु झालं’ (Mann Udu Udu Zala) या लोकप्रिय मालिकेतील दिपू म्हणजेच अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तिच्या या व्यक्तिरेखेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. दिपू ही प्रेक्षकांना आपल्यातलीच एक वाटते, त्यामुळे प्रेक्षकांकडून हृताला या व्यक्तिरेखेसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. मात्र आता हृताच्या आणि या मालिकेच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर येतोय. हृता ही मालिका सोडत असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी मालिकेच्या निर्मात्यांशी तिचा वाद झाला. या वादानंतर आता हृताने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. त्यामुळे आता मालिकेत हृताची जागा कोणती अभिनेत्री घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘ई टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सेटवरील स्वच्छतेच्या मुद्द्यावरून हृताचं निर्मात्यांशी भांडण झालं. या भांडणानंतर हृताने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. हृता करारबद्ध असल्याने ती एक महिन्याच्या नोटीस पीरिअडवर काम करणार असल्याचं कळतंय. दुसरीकडे हृताच्या लग्नाचीही जोरदार तयारी सुरू आहे. दिग्दर्शक प्रतीक शाहशी ती लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांनी साखरपुडा केला असून लवकरच ते आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत. हृताने मालिका सोडली असली तरी ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे तिचं नाटकसुद्धा नाट्यरसिकांच्या भेटीला येतंय. त्याचसोबत तिचा ‘अनन्या’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

मालिकेतील दिपू या भूमिकेविषयी हृता एका मुलाखतीत म्हणाली होती, “या व्यक्तिरेखेच्या लोकप्रियतेचं श्रेय पडद्यामागच्या सूत्रधारांना जातं. मी खरंतर ती व्यक्तिरेखा म्हणून फक्त दिसते पण हे प्रत्येक पात्र उभं करण्यात लेखकाचा आणि दिग्दर्शकाचा मोठा वाटा असतो. मला मंदार देवस्थळीसारखे चांगले दिग्दर्शक मिळाले, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. हृता आणि दिपूमध्ये एकच साम्य आहे ते म्हणजे चेहरा. दिपू जेवढी भित्री आहे तेवढी हृता नक्कीच नाहीये. दिपू ज्या वातावरणात लहानाची मोठी झाली ते मी अनुभवलं नाहीये आणि तिच ही भूमिका करण्यामागची खरी मज्जा आहे.”

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.