Kapil Sharma | ‘द कपिल शर्मा शो’साठी कपिलने वाढवलं मानधन, प्रेक्षकांना हसवण्यासाठी आकारणार ‘इतकी’ रक्कम!

अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान कॉमेडीयन आहे, हे आता सर्वांना माहित आहे. त्याच्या कॉमेडीचे लाखो चाहते आहेत. कॉमेडियनचा प्रसिद्ध शो ‘द कपिल शर्मा शो’ प्रेक्षकांनाही खूप आवडतो. मात्र, कपिलने मागील काही दिवसांनपासून या शोसह ब्रेक घेतला आहे. पण आता तो लवकरच या कार्यक्रमासह परत येणार आहे.

Kapil Sharma | ‘द कपिल शर्मा शो’साठी कपिलने वाढवलं मानधन, प्रेक्षकांना हसवण्यासाठी आकारणार ‘इतकी’ रक्कम!
कपिल शर्मा
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 9:50 AM

मुंबई : अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान कॉमेडीयन आहे, हे आता सर्वांना माहित आहे. त्याच्या कॉमेडीचे लाखो चाहते आहेत. कॉमेडियनचा प्रसिद्ध शो ‘द कपिल शर्मा शो’ प्रेक्षकांनाही खूप आवडतो. मात्र, कपिलने मागील काही दिवसांनपासून या शोसह ब्रेक घेतला आहे. पण आता तो लवकरच या कार्यक्रमासह परत येणार आहे. या वेळी कपिलने आपले मानधन देखील वाढवल्याचे वृत्त समोर येत आहे. बातमीनुसार कपिलने केवळ 10-20च नव्हे तर, तब्बल 50 लाखांनी आपली फी वाढवली आहे (Kapil Sharma increased his per day fees for The Kapil Sharma Show).

न्यूज 18च्या एका अहवालानुसार, कपिल आता एका आठवड्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये घेणार आहे. पूर्वी कपिल प्रत्येक एपिसोड साठी 30 लाख रुपये मानधन आकारत असे आणि आता प्रत्येक एपिसोडमागे 50 ते 70 लाखांची वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की, पूर्वी कपिल आठवड्याला 60 लाख रुपये घेत होता, मात्र आता तो 1 कोटी रुपये घेईल.

तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. याविषयी कपिल किंवा शोच्या निर्मात्यांनीही कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्याचबरोबर बातमी अशीही आहे की, कपिलचे बाकीचे साथीदार कॉमेडियनसुद्धा चांगली तगडी रक्कम घेणार आहेत.

कपिलचा शो बर्‍याच वेळा टीआरपीच्या यादीमध्ये सर्वात अग्रक्रमी होता. या शोमध्ये शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खान, दीपिका पदुकोण, करीना कपूर सारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

अर्चना पूरन सिंग शोमध्ये दिसणार का?

अलीकडेच अशी चर्चा रंगली होती की, आपल्या हास्यानं प्रत्येकाचे मन जिंकणारी अर्चना पूरन सिंग यावेळी शोमध्ये भाग घेणार नाहीय. ही बातमी आल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू परत येणार का? अशी ही चर्चा सुरु झाली आहे. पण स्वत: अर्चनानेही या वृत्तावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अर्चना म्हणाली, ‘मला याविषयी काहीही माहिती नाही. आतापर्यंत मी या शोचा एक भाग आहे. असं असलं तरी, मी जेव्हा जेव्हा नवीन प्रोजेक्टवर साईन करते, तेव्हा ही बातमी चर्चेत येऊ लागते. यापूर्वी ही बातमी माझ्या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळीही आली होती आणि आता मी एका मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली आहे, कदाचित म्हणूनच ही बातमी पुन्हा चर्चेत आली असावी.’

या शोबद्दल अर्चना पुढे म्हणाली की, हा शो तिच्यासाठी खूप खास आहे आणि तिला या शोमध्ये भाग घेण्यासाठी खुप उत्सुक आहे.

(Kapil Sharma increased his per day fees for The Kapil Sharma Show)

हेही वाचा :

Bigg Boss 15 | Khatron Ke Khiladi 11 नंतर अर्जुन बिजलानी सलमान खानच्या ‘बिग बॉस 15’मध्ये जाणार?

Happy Birthday Nilesh Sabale | ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’चा स्पर्धक ते ‘चला हवा येऊ द्या’चा कॅप्टन, वाचा निलेश साबळेचा ‘डॉक्टर ते अॅक्टर’ प्रवास

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.