AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ काही काळासाठी घेणार ब्रेक; कारण..

समीर, प्रसाद, नम्रता, गौरव, वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली. लॉकडाऊनच्या कठीण काळातही हा कार्यक्रम रसिकांचं मनोरंजन करत होता.

Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' काही काळासाठी घेणार ब्रेक; कारण..
Maharashtrachi Hasyajatra Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jun 07, 2022 | 11:06 AM
Share

सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे 500 भाग पूर्ण झाले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी लाफ्टर थेरपीच बनला आहे. जवळपास साडेतीन वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता हा कार्यक्रम काही काळासाठी ब्रेक घेतोय. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर, प्रसाद, नम्रता, गौरव, वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली. लॉकडाऊनच्या कठीण काळातही हा कार्यक्रम रसिकांचं मनोरंजन करत होता.

यामागच्या कारणाविषयी बोलताना सचिन मोटे (Sachin Mote) ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “आम्ही गेली साडेतीन-चार वर्षे हा कार्यक्रम करतोय. त्यामुळे आता आम्हालाही थोडं रिफ्रेश होण्याची गरज आहे. आमच्या भूमिकांवर वेगवेगळे प्रयोग झाले. मात्र आता त्यात काहीतरी नवीन घडणं गरजेचं आहे. तोचतोचपणा कमी करण्यासाठी काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा ब्रेक महत्त्वाचा आहे. पण हा ब्रेक मोठा नसेल एवढं नक्की. काही दिवसांनंतर पुन्हा आम्ही शूटिंगला सुरुवात करू.”

पहा व्हिडीओ-

“जेव्हापासून हा शो सुरू झाला आहे, तेव्हापासून आम्ही आमच्यातच आहोत. त्यातून जरा बाहेर पडण्याची गरज आहे. झरा मोकळं करणं गरजेचं आहे. सारखं उपसतच राहिलो तर विहिरीला पाणी राहणार नाही”, अशी प्रतिक्रिया सचिन गोस्वामी यांनी दिली.

प्रसाद-नम्रता यांची जोडी नेहमीच सरस ठरते, गौरव आणि ओंकार यांचे विनोद प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. हास्यजत्रा पाहून आनंद आणि मनोरंजन मिळाल्याच्या कित्येक प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळाल्या. रविवारची हास्यजत्रा झाल्यावर प्रेक्षकांनी चार दिवस हास्यजत्रेची मागणी केली होती. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हे विनोदवीर आठवड्यातून पाच दिवस यायला सज्ज झाले. मात्र आता काही काळ क्रिएटिव्ह ब्रेकची फार गरज असल्याची प्रतिक्रिया या कलाकारांनी दिली.

Follow Us
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती.
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!.
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!.
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा.
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी.
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी.
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार.
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप.
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न.
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न.